Chitra Wagh on Anil Parab : माझ्या चारित्र्यावर किती वेळा बोलणार, आम्ही काय रस्त्यावर पडलो आहे का?

Continues below advertisement

मुंबई : दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन विधिमंडळ सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषेदत शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला, भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांचे नाव घेऊन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दिशा सालियन प्रकरण हे जाणीवपूर्वक ठाकरेंना बदनाम करण्याचा घाट असल्याचे महाविकास आघाडीतील आमदारांनी म्हटलं आहे. सभागृहात चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यातील वाद सोशल मीडियात चित्रा वाघ विरुद्ध सुषमा अंधारे यांच्यापर्यंत पोहोचला. तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते मी.. असे चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. त्यावर, आकडा कमीच सांगितलं असं लोकं म्हणतात, असं ट्विट सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी केलं होतं. त्यानंतर, वाघ यांनीही ट्विट करुन सुषमा अंधारेंवर जोरदार हल्लाबोल केला. त्यामुळे, सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात चांगलीच जुंपली आहे.  

सुषमा अंधारेंच्या ट्विटवर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, जर आमच्यावर कोणी बोलणार असेल तर त्याला आम्ही देखील तसंच उत्तर देणार असल्याचे चित्रा वाघ यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. कोणाच्या मुलाबाळावर बोलणं मलाच आवडत नाही, पण जर तुम्ही दहा वेळेस आमच्या कॅरेक्टरवर बोलत असाल  तर त्याचं उत्तर आम्ही देणार. हम किसीको छेडते नही, पर अगर किसीने छेडा तो छोडते भी नही.. असे म्हणत चित्रा वाघ यांनी सभागृहातील घटनेवर आणि त्यानंतर सुषमा अंधारे यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram