Covid third wave आली तर पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका, Ajit Pawar यांचा जनतेला इशारा
मागील काही दिवसांपासून सातत्यानं वाढणारी कोरोना रुग्णसंख्या पाहता आता कठोर पावलं उचलण्याचा इशारा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तूर्तास कोरोनाचे रुग्ण पाहता रुग्णसंख्या वाढ ही प्रशासनापुढं उभी असणारी मोठी अडचण ठरत आहे. याच धर्तीवर सध्या लॉकडाऊन लागू केला नसला तरीही तिसरी लाट आली तर पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका असा उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचा जनतेला इशारा दिला आहे.