Ajit Pawar: Lockdown बद्दल उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, राज्यात पुन्हा कठोर निर्बंध? ABP Majha

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज साताऱ्यात सांगितलं. पश्चिम बंगालसह काही राज्यात निर्बंध घातले गेलेत, त्यामुळे आपल्याकडे कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं अजित पवार म्हणालेत. लॉकडाऊनबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं. गेल्या आठवडाभरात राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढल्यानंतर लॉकडाऊन करणार का याची चर्चा सुरु झालीय. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचं वक्तव्य सूचक आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola