Bihar Child Trafficking : बिहारमधून आलेल्या 59 लहान मुलांना सोडवलं, लहान मुलांच्या तस्करीचा संशय
abp majha web team
Updated at:
31 May 2023 06:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात सुरु असलेल्या काही अशा घटनांची ज्याचा संशय थेट लहान मुलांच्या तस्करीशी जोडला जातोय.... बिहार राज्यातील अनेक मुस्लिम मुलं पश्चिम महाराष्ट्रातील मदरशांमध्ये येतायत... पण इतक्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात ही मुलं का पाठवली जातायत? असा सवाल सध्या पोलिसांना पडलाय... १५ दिवसांपूर्वीच बिहारमधली ६१ मुलं ट्रकमधून कोल्हापूरच्या आजऱ्यात आली होती... आणि आता मनमाडमध्ये दानापूर-पुणे एक्सप्रेसमधून रेल्वे अधिकाऱ्यांनी ५९ मुलांची सुटका केलीए... गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि रेल्वे यंत्रणांच्या कारवायांमध्ये १२२ मुलांची सुटका करण्यात आलीए... त्यामुळे बिहारमधून पश्चिम महाराष्ट्राच्या मदरशांमध्ये मुलं का येतायत? असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय..