Lack of Oxygen Death : ... त्यांनी केंद्र सरकारवर खटला दाखल करावा : संजय राऊत Sanjay Raut
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही असा दावा केंद्र सरकारनं केलाय. संसदेत खासदार के सी वेणुगोपाल यांनी उस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राज्यसभेत सरकारकडून हा दावा करण्यात आलेला आहे. मात्र दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा ऑक्सिजनची मागणी वाढली होती हे मात्र या उत्तरात नमूद करण्यात आलंय. वास्तविक ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र तरीही सरकारकडून असा दावा झाल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची माहिती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून केंद्राकडे येते. मात्र अद्याप केंद्राकडे ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याची माहिती कोणत्याही राज्यानं दिली नसल्याचं केंद्र सरकारनं राज्यसभेत दिलेल्या उत्तरात म्हटलंय.
ऑक्सिजनअभावी ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल करावा अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेय.