Aurangabad: आईला 20 वर्षांपूर्वी घराबाहेर काढणाऱ्या मुलांना गावकरी आणि बहिणींनी रोखलं ABP Majha
abp majha web team
Updated at:
03 Jan 2022 07:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये लिहाखेडी गावात आईचे अंत्यसंस्कार करण्यापासून मुलांना गावकऱ्यांनी रोखलं. आईला पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर काढलं. तेव्हा मुली आणि जावयांनी तिला आधार दिला. वृद्धापकाळानं शनिवारी तिनं जगाचा निरोप घेतला तेव्हा तीन मुलांपैकी दोघानी पाहुण्यासारखी हजेरी लावली. त्यामुळे संतप्त झालेल्या लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तीन मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीनं आईला खांदा दिला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले.....