नाशिकमध्येही दुष्काळ, कोर्टाला पुन्हा विनंती करु : देवयानी फरांदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यामुळे जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी आता कोणताही कायदेशीर अडथळा राहिलेला नाही. हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा किंवा सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देत, दिवाळीच्या सुट्टीनंतर आम्ही ही याचिका ऐकू, असं म्हटलं आहे. नगर आणि नाशिकच्या धऱणांमधलं पाणी जायकवाडीला सोडा,
असे आदेश जलसंपत्ती प्राधिकरणानं दिले आहेत. मात्र याला नगर आणि नाशिकच्या लोकप्रतिनिधीं विरोध केला होता. आजपासून पाण्याच्या प्रवाह मार्गातील सर्व बंधारे मोकळे केले जाणार आहेत. पण पाणी कधी सोडलं जाणार हे मात्र नक्की नाहीय..
असे आदेश जलसंपत्ती प्राधिकरणानं दिले आहेत. मात्र याला नगर आणि नाशिकच्या लोकप्रतिनिधीं विरोध केला होता. आजपासून पाण्याच्या प्रवाह मार्गातील सर्व बंधारे मोकळे केले जाणार आहेत. पण पाणी कधी सोडलं जाणार हे मात्र नक्की नाहीय..