नागपूर : बाईकचा धक्का लागल्याने वाद, जमावाकडून तरुणाची हत्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारी आणखी एक घटना समोर आली आहे. बाईकचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणातून आणि जुन्या वैमनस्यातून जमावाने एकाची हत्या केली. शनिवारी बाबा रामसुबेर नगरमध्ये विक्की मेश्राम या युवकाच्या बाईकचा धक्का सोळंकी कुटुंबातील एका युवकाला लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या सोळंकी कुटुंबांकडून विक्की मेश्रामला धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मेश्राम कुटुंबाने शांतीनगर पोलीस स्टेशनला तक्रार ही दिली होती. मात्र पोलिसांनी किरकोळ गुन्हे दाखल करत पुढे कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर रविवारी रात्री सोळंकी कुटुंबाशी संबंधित 20 ते 25 लोकांच्या जमावाने मेश्राम कुटुंबाच्या घरावर हल्ला केला. यात निखील मेश्रामची घराच्या अंगणातच हत्या करण्यात आली, तर विक्की मेश्राम मृत्यूशी झुंज देत आहे.