सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण, कणकवलीतील ग्रामस्थांचा मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई गोवा महामार्गाच्या कणकवलीतल्या प्रकल्पग्रस्तांनी आज शहर बंदची हाक दिली. सोबतच कणकवली उपविभागीय कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. चौपदरीकरणात कणकवलीतील विस्थापितांना विचारात घेण्यात आलेलं नाही आणि सोबतच जमिन संपादनाचा मोबदला अत्यंत कमी असल्याचा आरोप प्रकल्पबाधितांचा आहे. मूल्यांकन योग्य पद्धतीने न झाल्यास याचा व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसेल आणि अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त होतेय. शासनाने या बाबीचा गांभीर्यानं विचार करण्याचं आवाहन आंदोलकांनी केलंय.