Suniel Shetty Majha Maha Katta :तब मुझे डर लगा.... सुनील शेट्टींनी सांगितला पहिल्य चित्रपटाचा किस्सा
Sunil Shetty On ABP Majha Maha Katta: मराठी भाषेवरून (Marathi Language) होणारं राजकारण (Maharashtra Politics) आणि सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा आहे, असं वक्तव्य बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता सनील शेट्टीनं (Sunil Shetty) केलंय. पण, त्यासोबतच मुंबईत (Mumbai News) राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, असंही सुनील शेट्टीनं अगदी निक्षून सांगितलं आहे.
एबीपी माझाच्या (ABP Majha) महाकट्ट्यावर (Majha Maha Katta) बोलताना बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीनं (Bollywood Actor Sunil Shetty) रोखठोक मत व्यक्त केलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी बोलताना म्हणाला की, "मी खरंतर अभिनय नंतर शिकलो, पण नेहमीच वेळेवर येतो... टाईम मॅनेजमेंट स्किल्स आपोआप शिकलो... म्हणूनच मी 35 वर्ष झालीय टिकलोय... मी आज आलोय इथे... मी एबीपी माझाशी फार पूर्वीपासूनच जोडला गेलोय... नेटवर्क खूप असतात, पण फार कमी नेटवर्क परिस्थिती लक्षात घेऊन न्यूज सांगतात... मी इथे विभाचं नाव आवर्जुन घेईल, आपल्या सर्वांचं वैयक्तिक नुकसान झालंय... एबीपी म्हणजे, विभा आमच्यासाठी... ती एक अशी व्यक्ती होती, जी नेहमीच आमच्या दृष्टीकोनातून बातमी द्यायची, पण ज्यावेळी तिच्या निधनाची बातमी समजली, त्यावेळी मला खरंच असं वाटलं की, माझं वैयक्तिक नुकसान झालंय...
बॉलिवूड पार्ट्यांबाबत बोलताना सुनिल शेट्टी म्हणाला की, "मी आजही पॉलिटिकल पार्ट्या आणि बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर आहे... नेहमीच दूर राहिलोय... काही राजकीय व्यक्ती आहेत, जे माझे आदर्श आहेत... तसंच, मी फिल्म इंडस्ट्रीबाबतही ठरवलेलं की, त्यावेळी मी आधीच ठरवलेलं की, मी आधी लग्न करिन आणि मग फिल्म्स करिन किंवा जर मी फिल्म्स करतोय, तर मी ठरवीन की मला कधी घरी जायचंय... मी नो मॅन्स लँडकडेही नाही जात... तसंही पाकिस्तानवर माझा खूप राग आहे, पण मी माझी बॉर्डर लाईन पाळतो..."