अमरावती : 'चांदस वाथोडा'तील शेतकरी बोगस कर्जामुळे त्रस्त
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती जिल्ह्यातल्या चांदस वाथोडा गावातील अनेक शेतकरी कर्जामुळे हैराण झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेनं लाखोंचं कर्ज थकीत दाखवल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावे स्वतःची जमीन नाही, जे शेतकरी बँकेतही गेलेले नाहीत त्यांच्या नावे लाखोंचं कर्ज उचलण्यात आलं आहे. आता या कर्जातून कशी मुक्ती मिळवायची या विवंचनेत सध्या हे शेतकरी आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी याची तक्रार थेट विभागीय आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान या घटनेला जबाबदार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार अनिल गोटेंनी केली आहे.