✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour : Jalna Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कचरा,धूळ,पाणीटंचाई...जालन्यातील गंभीर प्रश्न

विजय साळवी, एबीपी माझा   |  28 Jan 2025 09:42 PM (IST)

मराठवाड्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे जालना. जालना... सोने का पालना अशी म्हणच आहे मराठवाड्यात. पण तरीसुद्धा या शहराला अनेक समस्यांनी ग्रासलं आहे. नगरपालिकेचं महापालिकेत रुपांतर झालं असलं तरी स्थानिकांच्या आयुष्यात फार काही फरक पडलेला नाही. महापालिकेचे महामुद्दे या आपल्या विशेष सत्रात आज आपण जालना शहरातील याच समस्यांवर प्रकाशझोत टाकणार आहोत. पाहूयात एबीपी माझाचा विशेष रिपोर्ट.  


जालन्यात सर्वात मोठी समस्या आहे ती पाण्याची. जालन्यात आजही आठ दिवसांनी एकदा पाणी येतं, आणि जेव्हा येतं ते देखील स्वच्छ पाणी नसतं. जालन्याला जायकवाडी धरणातून पुरवठा होतो. २०२४मध्ये तर पाऊस देखील चांगला झाला, धरण काठोकाठ भरलं. मात्र नियोजनाच्या अभावापायी अनेक वर्षांपासून आठ दिवसाआडच पाणी येतंय. 


पाणीपुरवठा वाढवण्यासाठी अधिक निधीची गरज आहे, असं महापालिका आयुक्त संतोष खांडेकर म्हणाले. निधी कमी पडण्याचं एक कारण हे देखील आहे की जालन्यात अधिकृत आणि अनधिकृत नळ कनेक्शन्सची संख्या जवळपास सारखीच आहे. म्हणजे अधिकृत नळ कनेक्शनची संख्या आहे १८ हजार ७७१. तर बेकायदेशीर नळजोडण्यांची संख्या ३० ते २५ हजारांच्या घरात आहे. म्हणजेच अर्ध जालना पाणीपट्टी भरतच नाही. 


केवळ पाणीपट्टीच नाही तर मालमत्ताची थकबाकी देखील मोठी आहे. ४२२ कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या जालना महापालिकेला केवळ मालमत्ता करामधून १२० कोटींचं येणं आहे. त्यासाठी पालिकेनं वसूली आणि जप्ती मोहीम देखील हाती घेतलीये. 


येत्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. त्याआधी जर किमान पाण्याचा प्रश्न सोडवला तर ठीक, नाहीतर जनता या राजकारण्यांना मतांबाबत कोरडं ठेवेल यात शंका नाही. रवींद्र मुंडे, एबीपी माझा, जालना. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour : Jalna Corporation : महापालिकेचे महामुद्दे : कचरा,धूळ,पाणीटंचाई...जालन्यातील गंभीर प्रश्न

TRENDING VIDEOS

Parag Shah slapped auto driver : आमदार पराग शाहांची रिक्षाचालकाला कानशि‍लात19 Hour ago

T-20 WorldCup Team Announce : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा, शुभमन गिलला वगळलं21 Hour ago

Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले22 Hour ago

Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना23 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.