✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Zero Hour Full : उद्धव ठाकरेंचा मविआला रामराम? ते पवार कुटुंब पुन्हा एकत्र? सविस्तर चर्चा

विजय साळवी, एबीपी माझा   |  13 Dec 2024 10:43 PM (IST)

नमस्कार मी, विजय साळवी... एबीपी माझाचा विशेष कार्यक्रम झीरो अवरमध्ये आपलं स्वागत..

गर्व से कहो हम हिंदू है... अशी गर्जना राष्ट्रीय राजकारणात पहिल्यांदा करणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या आक्रमक शैलीतल्या हिंदुत्वासाठी देशभर ओळखलं जायचं. मंडळी, तो एक काळ होता.. काटक शरीरयष्टी असलेले बाळासाहेब ठाकरे... खांद्यावर भगवी शाल ओढून... जेव्हा मंचावर यायचे.. तेव्हा मुंबईतील शिवाजी पार्क असो.. किंवा परभणीतील इंदिरा मैदान असो.. प्रत्येक ठिकाणी जनसागर ओसंडून वाहात असायचा.. सभांमधून हिंदुत्वाचा एल्गार व्हायचा...

इतकंच काय तर नव्वदच्या दशकात बाळासाहेब ठाकरेंना देशात हिंदुत्वाचा पोस्टरबॉय म्हणून लोकमान्यता मिळाली होती... आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या बळावर त्यांच्या शिवसेनेला मिळालेली सत्ता.. साऱ्या महाराष्ट्रानं पाहिली.. त्यांच्या आक्रमक हिंदुत्वाचे देशभर चाहते तयार झाले होते.. त्या काळात बाळासाहेबांना मानणारा वर्ग देशभर इतका मोठा होता की उत्तर प्रदेशात त्यांच्या शिवसेनेचा आमदारही विधानसभेत निवडून आला. त्यांनी १९८६ साली विलेपार्लेच्या पोटनिवडणुकीत धर्माच्या मुद्द्यावर प्रचार केला, या कारणामुळं त्यांना सहा वर्षांसाठी मतदानाचा अधिकार गमावला होता..

मंडळी.. हिंदुत्वाच्या त्याच लाटेवर भारतीय जनता पक्ष स्वार झाला.. आणि त्याच हिंदुत्वाच्या एकतेची ताकद आपल्याला आज राष्ट्रीय राजकारणात दिसतेय.

भाजप पक्ष म्हणून मोठां झाला.... तशीच शिवसेनाही राज्यव्यापी बनली.. बाळासाहेबांनीही उतारवयात शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती दिलं.. पण, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे बाळासाहेबांसारखं आक्रमक नव्हतं.. उद्धव ठाकरेंचा मूळ स्वभावच शांत.. आणि संयमी आहे. पुढे आदित्य ठाकरेंनीही पक्षाला नव्या पिढीचा.. तरुणांचा पक्ष बनवण्यासाठी अनेक गोष्टी बदलल्या... परिणामी काळाच्या ओघात आणि बदलत्या राजकीय परिस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेची आक्रमकता कमी झाली.. पण पक्ष सत्तेत राहत होता.. अगदी २०१९ सालीही शिवसेनेला भाजपसोबत सत्तेत जाण्याची संधी मिळाली होती. पण, तेव्हा त्यांनी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्रीपद मिळवलं.. आणि पुढे काय काय झालं.. हे मी काही नव्यानं सांगणार नाही..

पण मंडळी.. गेल्या पाच वर्षात एक गोष्ट मात्र नक्की झाली... ती म्हणजे भाजपकडून आणि एकनाथ शिंदेंकडून प्रामुख्यानं मराठी जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न झाला.. ती म्हणजे..

उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जात हिंदुत्व सोडलं.. इतकंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसाही त्यांनी सोडून दिला..

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसला. राज्यातल्या मतदारांनी त्यांना नाकारल्याचं आकडेवारीतून दिसलं..
त्यामुळं महापालिकेच्या आगामी निवडणुका उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीनं अस्तित्व दाखवून देण्याची संधी ठरणार आहे.

त्यातही एखाद्या राज्यापेक्षा मोठं बजेट असलेली मुंबई महापालिका सर्वात महत्त्वाची आहे. गेल्या अडीच दशकांपासून मुंबई महापालिका ही उद्धव ठाकरेंच्या हातात आहे. या मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या काळात कोणत्याही दिवशी जाहीर होईल.. त्यामुळं मुंबई महापालिका आपल्या हातात राखण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचाच पॅटर्न हाती घेतल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. 


मंडळी.. पाण्यावर काठी मारली तर पाणी वेगळं होतं, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी फूट पडेल असं कधी वाटलं नव्हतं. पण शरद पवारांच्या सख्ख्या पुतण्याच्या म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीतून अजितदादा ते थेट सत्ताधारी महायुतीत जाऊन बसले. 


त्यामुळं राजकारणात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. पण राज्यातल्या राजकारणानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि मग त्या फुटीनं पवार कुटुंबही दुभंगलं. आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीनं पवार कुटुंबीयांमधला दुरावा आणखी वाढला. त्यांची दिवाळीही वेगवेगळी साजरी झाली.


पण आता शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची काल दिल्लीत भेट घेतली आणि पवार कुटुंबीयांच्या मनात... राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनातही त्या दोघांनी एकत्र यावं अशी भावना निर्माण झाली आहे. कारण अजितदादांनी थोरल्या काकांची घेतलेली ही भेट पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणणारा ठरला होता.


शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या आई आणि अजित पवारांच्या वहिनी सुनंदा पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पवारसाहेब आणि अजितदादांनी कुटुंब म्हणून एकत्र यावं ही भावना बोलून दाखवताना सुनंदाताईंनी राजकारणावर थेट भाष्य करणं मात्र आवर्जून टाळलं. पाहूयात त्या काय म्हणाल्या आहेत?

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • झीरो अवर
  • Zero Hour Full : उद्धव ठाकरेंचा मविआला रामराम? ते पवार कुटुंब पुन्हा एकत्र? सविस्तर चर्चा

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand1 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.