✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Shambhuraj Desai VS Aaditya Thackeray : जमिनीवरुन 'ओरखडा' अधिवेशनात आखाडा Special Report

abp majha web team  |  16 Jul 2025 08:10 AM (IST)
ABP News

Shambhuraj Desai VS Aaditya Thackeray : जमिनीवरुन 'ओरखडा' अधिवेशनात आखाडा Special Report


Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)


 नेते मंडळींचे मानापमान आणि वैयक्तिक इगो यामुळे सर्वसामान्यांचे मूळ प्रश्न कसे मागे पडतात याच उदाहरण विधी मंडळ अधिवेशनात दिसून आलं. विषय होता गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचा. मात्र या प्रश्नाच उत्तर मिळण्या ऐवजी सभागृहात दिसलं ते नेत्यांमधला शाबदिक युद्ध आणि अपमान नाट्य. केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय कसा साधता येईल या प्रश्नाच उत्तर शोधणाऱ्या दोन्ही शिवसेनांमध्येच हमबरी तुम्री रंगली. सरकार मधील समन्वय. 2017 पासून या विषयाच्या लक्षवेधी लागतायत, आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ, आम्ही ही बैठक घेऊ, आम्ही ते करू, मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत, त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे. माझं एवढाच मी पोट तिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय, माझा पॉईंटेड प्रश्न हा आहे, काही टाईमबाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का? यानंतर उत्तर देण्यासाठी उभ्या राहिलेल्या मंत्री शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरे. मुख्यमंत्री असल्याच्या काळाचा संदर्भ दिला. त्या काळात केंद्र सरकारकडे एकदाही पाठपुरावा का केला नाही असा प्रतिसवाल त्यांनी विरोधकांना केला. यावरून सभागृहात जोरदार गोंधळाला सुरुवात झाली. मला नम्रपणाने सांगायचे 2019 ते 2022 या अडीच वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही. ऐका आता काय? या उत्तर. नंतर सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर सुरू झाली एकमेकांना दूषण देण्याची स्पर्धा उलट 22 तारखेला माननीय 22 ला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलीली एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा गोंधळ वाढत असल्याचे पाहून दोन्ही बाजूंनी सावरासावर करण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी प्रत्येक वेळी राजकारण डोळ्यासमोर ठेवून, तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं, 19 ला हे झालं ना 22 ला हे झालं, हे अपेक्षित नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरन राडा करायचा, असं करून जोरजोरात बोलायचं, याचा काय उपयोग होणार आहे? आज माझा प्रश्न काय आहे? अर्धा तास लक्षवेधी चालली. शेवटी सभागृह तहकूप झालं. या गोंधळात मूळ प्रश्न आणि त्याचं उत्तर बाजूलाच पडलं. वांद्र्यामध्ये 9,483 झोपडपट्ट्यांच पुनर्वसन रखडलय. वांदऱ्यातील 42 एकर जमिनीवर हे पुनर्वसन होण अपेक्षित आहे मात्र ही जमीन संरक्षण विभागाच्या मालकीची आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मध्ये समन्वय आवश्यक आहे. प्रश्न मार्गी लावण्यासाठी. मुंबईतील आमदारांची बैठक बोलवावी अशी आदित्य ठाकरेंची मागणी होती. मात्र अधिवेशनात हा विषय येऊन देखील निर्णयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या हाती काहीच लागलं नाही. पाच दिवसांपूर्वीच अधिवेशनात अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जोरदार वाद झाला होता. बाहेर ये तुला दाखवतो या शंभूराज यांनी दिलेल्या तंबीची राज्यभर चर्चा झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन्ही शिवसेनांमध्ये जुंपली आहे. त्यामुळे आपले राजकीय हिसेब. वैयक्तिक इगो यांचा झालेला सुळसुळाट कधी थांबणार आणि जनतेच्या प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधक लक्ष कधी केंद्रित करणार हाच जनतेला पडलेला खरा प्रश्न आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Shambhuraj Desai VS Aaditya Thackeray : जमिनीवरुन 'ओरखडा' अधिवेशनात आखाडा Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.