✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Mumbai Coronavirus Third Wave : मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही; महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

मनश्री पाठक, एबीपी माझा   |  05 Oct 2021 08:51 PM (IST)

Mumbai Coronavirus Third Wave Update : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे धास्तावलेल्या मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं उच्च न्यायालयात केला आहे. मुंबईत झालेलं लसीकरण आणि सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी याचा दाखला देत महापालिकेनं मुंबई सुरक्षित असल्याचा निर्वाळा न्यायालयात दिला. 


मुंबईत 42 लाख नागरिकांना कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर 82 लाख नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. लसीकरण मोहिम योग्य प्रकारे सुरु असल्याचंही महापालिकेनं सांगितलं आहे. अंथरुणाला खिळलेल्या, अपंग तसेच आजारी नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयात मुंबई महापालिकेकडून माहिती देण्यात आली आहे. 


अंथरुणाला खिळलेल्या, अपंग तसेच आजारी नागरिकांचे घरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी मुंबईतील करोनास्थितीची, लसीकरण मोहिमेची पालिकेतर्फे अ‍ॅड. अनिल साखरे यांनी न्यायालयाला माहिती दिली. त्याच वेळी मुंबईतील कोरोनावरील लशीचा पहिला आणि  दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची आकडेवारी सादर करण्यात आली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता मुंबईला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचं आणि मुंबई सुरक्षित असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. तसेच ही याचिका प्रलंबित ठेवण्याची गरज नसल्याचा दावाही केला आहे.


याचिकाकर्त्यांनीही पालिकेच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. लसीकरण मोहीम योग्यरीतीने सुरु असल्याचं सांगितलं. शिवाय घरोघरी लसीकरण मोहिमेला आधी नकार देणाऱ्या केंद्र सरकारनेही आता त्याबाबत धोरण आखल्याचं न्यायालयाला सांगितलं. त्यावर अंथरुणाला खिळलेले, आजारी आणि अपंग नागरिकही लसीकरणापासून वंचित राहणार नाहीत, असं नमूद करत न्यायालयानं याचिका निकाली काढली आहे.


मुंबई महापालिकेनं न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंथरुणाला खिळलेल्या 2586 नागरिकांना दोन्ही लसमात्रा, तर तीन हजार 942 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलं आहे, असंही पालिकेतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. तर मुंबईतील बनावट लसीकरणप्रकरणी दाखल झालेल्या दहापैकी नऊ गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलिसांनी पूर्ण करून आरोपपत्रही दाखल केल्याची माहितीही मुंबई महापालिकेनं राज्य सरकारतर्फे न्यायालयाला दिली. 

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Mumbai Coronavirus Third Wave : मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही; महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

TRENDING VIDEOS

Uddhav Thackeray On Eknath Shinde : गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते गांडूळाने फणा काढायचा नसतो18 Hour ago

Prasad Lad Shock : प्रसाद लाड यांना परिषदेत शॉक, म्हणाले; मला काही झाल्यास राज्याचं नुकसान..18 Hour ago

Nawab Malik Vs BJP : मलिकांऐवजी दुसऱ्याकडं नेतृत्व दिल्यास भाजपचा आक्षेप नसणार - सूत्र19 Hour ago

Nagpur Leopard Special Report बिबट्याचं संकट पण वनविभागाची यंत्रणा भंगार, बिबट्याला नेणारी गाडीच बंद22 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.