Arvind Kejriwal Delhi Election | दिल्लीत सत्ता गेली, अरविंद केजरीवालांचं नेमकं कुठं चुकलं? Special Report

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDelhi Election Result 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकांचे जे निकाल (Delhi Election Results 2025) समोर आले आहेत ते पूर्णपणे अनपेक्षित असे आहेत. भाजपने (BJP) यंदा मोठी मुसंडी मारत दणदणीत विजय संपादन केलाय. शिवाय अनेक दिग्गजांनाही धक्का दिला आहे. ज्या आम आदमी पक्षाने नव्या प्रकारचे राजकारण सुरू केले होते आणि ज्यात दिल्ली बदलण्याची क्षमता असल्याचे बोललं जात होतं, त्याच पक्षाला त्यांच्या गडातून उखडले गेले आहे.
नवी दिल्लीच्या जागेवरून अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) स्वतः पराभूत झाले, आहेत. तर मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन हे देखील पराभूत झाले आहेत. आता हे सर्व घडले याचा अर्थ भाजपने नक्कीच मोठी खेळी खेळत मतदारांचा विश्वास जिंकला आहे. परिणामी जनतेनेही भरघोस मतदान त्यांच्या बाजूने केल्याचे दिसून आले आहे. त्यातील नेमकी कारणे काय हे जाणून घेऊया.
निर्मला सीतारामन यांनी लिहिली विजयाची शौर्यगाथा?
आता भाजपच्या या मोठ्या विजयामागे अनेक कारणे आहेत, पण एक निर्णय असा आहे की जो गेम चेंजर मानला जात आहे. हा निर्णयही दिल्लीतील मतदानाच्या अवघ्या 100 तास आधी घेण्यात आला होता. एकीकडे दिल्लीत निवडणुका होत होत्या, तर दुसरीकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला होता. 2014 नंतर सर्वात मोठी घोषणा यावेळी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या. त्यातील 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर जाहीर केलेलं नाही. आता या निर्णयाने सगळी समीकरणेच बदलून गेली आहेत, एक्झिट पोलनेही हे दाखवून दिले आहे, असा विश्वास सर्व तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मध्यमवर्गाची मते भाजपला मिळवण्यात यश.
किंबहुना दिल्लीत मध्यमवर्गीय मतदारांनी भाजपच्या बाजूने लाट निर्माण केली. ज्या मध्यमवर्गाला कोणत्याही पक्षाकडून काहीच मिळत नव्हते, तिथे आम आदमी पक्षापासून ते काँग्रेसपर्यंत ते केवळ मागासलेल्या समाज, मुस्लिम आणि इतर जातींवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत होते, हा मध्यमवर्ग कोणालाच दिसत नव्हता. मात्र यावेळी भाजपने या मध्यमवर्गाला लक्ष्य केले आहे. परिणामी, दिल्लीत भाजपच्या बाजूने जे वातावरण निर्माण झाले आहे त्यात मध्यमवर्गाचा महत्त्वाचा वाटा असल्याची साक्ष आकडेवारी देत आहेत.