Nagpur Crime | नागपुरात 12 दिवसात हत्येच्या 9 घटना, नागपूर राज्याचं क्राईम कॅपिटल? स्पेशल रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Nov 2020 10:21 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूरात गुन्हेगारी संपली असे गृहमंत्री अनिल देशमुख जरी म्हणत असले. तरी नागपुरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारीच्या गंभीर घटना पाहता त्यांचा दावा पोकळ असल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण मध्ये दिवाळीच्या आधी आणि नंतर अवघ्या 12 दिवसात हत्येच्या 9 घटना घडल्या आहेत. कुठे गॅंग वॉर तर कुठे पैसे वसुलीसाठी गोळीबार होत आहे. त्यामुळे गृहामंत्र्यांच्याच जिल्ह्यात कायद्याच्या राज्याला गुन्हेगारीचा सुरुंग लागल्याचे चित्र आहे.