मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा रवी शास्त्री यांची पुन्हा एकडा निवड झाल्यानंतर फलंदाजी प्रशिक्षकपदावर संजय बांगर यांचीच निवड होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण विराट कोहलीच्या टीम इंडियाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदावरुन संजय बांगर यांना डच्चू देण्यात आला आहे. बांगर यांच्याऐवजी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून माजी कसोटीवीर विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून आर. श्रीधर यांना कायम ठेवण्यात आलं आहे.


भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीतून स्पर्धेबाहेर व्हावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI ने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागवले होते. त्यानंतर या सर्व निवड करण्यात आल्या आहेत.

माजी सलामीवीर विक्रम राठोड यांची कारकीर्द ?

  • सहा कसोटी सामने

  • सात एकदिवसीय सामने

  • पंजाबमधून राज्यस्तरीय क्रिकेट सामने

  • 20106 मध्ये राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य


भारताच्या इतरही प्रशिक्षक पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यात भारतीय संघाचे फिजियो म्हणून नितीन पटेल यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र डोंगरे हे भारतीय संघाचे प्रशासकीय व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी पुन्हा रवी शास्त्री यांचीच निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख कपिलदेव यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची शास्त्री यांची ही चौथी टर्म दोन वर्षांची असेल. 2021 सालच्या विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर राहतील.

रवी शास्त्री यांच्यासह टॉम मूडी, माईक हेसन, फिल सिमन्स, रॉबिन सिंह आणि लालचंद राजपूत हे पाचजण भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होते. त्यातल्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्याची जबाबदारी माजी कर्णधार कपिलदेव, माजी कसोटीवीर अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांच्या त्रिसदस्यीय समितीवर सोपवण्यात आली होती.

संबंधित बातम्या

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा रवी शास्त्री

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ कुणाच्या गळ्यात?