भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजी करताना भारताने 20 षटकात 4 बाद 185 धावा केल्या. यजमान वेस्टइंडिज महिला संघाला 20 षटकात 9 बाद 101 धावांपर्यंत मजल मारता आली. शेफालीने 6 चौकार आणि 4 षटकार मारत 73 धावा केल्या. टी-20 क्रिकेटमधील हे तिचे पहिले अर्धशतक आहे. तर स्मृती मानधनाने 46 चेंडूत 11 चौकारांसह 67 धावा केल्या. शेफाली आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 143 धावा जोडल्या
वेस्टइंडिजकडून शॅमेने कॅम्पबेलने सर्वाधिक 33 धावा केल्या. हॅली मॅथ्यूजने 13, स्टेसी एन किंगने 13 आणि किशोना नाइटने 12 धावांचे योगदान दिले.