एक्स्प्लोर

IPL 2022 : मुंबई नेमकी कुठे चुकली? सलग तीन पराभवाची  पाच कारणे 

IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईची पंधराव्या हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे.

IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईची पंधराव्या हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. मुंबईला सलग तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या दोन सामन्यात मुंबईचा निसटता पराभव झाला होता. मात्र अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कोलकाताने मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते. मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने पाच गडी आणि चार षटकं राखून केला. मुंबईच्या पराभवाची नेमकी कारण काय? 

रोहितचा फ्लॉप शो - 
मुंबईच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण कर्णधार रोहित शर्मा हा आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 41 धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी  करता आली नाही. तीन सामन्यात रोहित शर्माला फक्त 64 धावा काढता आल्या.  रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. 
 
फलंदाजीत सातत्य नाही - 
ईशान किशन आणि तिलक वर्मा वगळता एकाही फलंदाजाला फलंदाजीत सातत्य राखता आले नाही.  अनमोलप्रीत सिंह, टिम डेविड, कीरोन पोलार्ड आणि डेनियल सेम्स यांना आपल्या फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. तिसऱ्या सामन्यात तर अनमोलप्रीत आणि टिम डेविड यांना अंतिम अकरामधून बाहेर ठेवावं लागलं.  

संथ धावगती - 
तिन्ही सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी संथ गतीने धावा काढल्या. फलंदाज वेगाने धावसंख्या काढण्याऐवजी खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होते. आतापर्यंत एकाही फलंदाजाला विस्फोटक फलंदाजी करता आली नाही. मुंबईची धावगती प्रत्येक सामन्यात संथ राहिली आहे. तिसऱ्या सामन्यात पावर प्लेमध्ये एक विकेट गमावूनही 45  धावाच करु शकले. पराभवाचं हे एक मोठं कारण आहे.  

बुमराह रंगात नाही -
राजस्थान रॉयलविरोधातील अखेरचं षटक वगळलं तर आतापर्यंत बुमराहला आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. बुमराहच्या गोलंदाजीत ती धार दिसत नव्हती. पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात बुमराहची विकेटची पाटी कोरीच राहिली होती. फक्त राजस्थानविरोधात बुमराहला तीन विकेट घेता आल्या. त्याशिवाय बुमराह फ्लॉप राहिलाय.  

चौथ्या आणि पाचव्या गोलंदाजाची कमी - 
मुंबईच्या पराभवाच्या मागे गोलंदाजीही मोठं कारण आहे. टायमल मिल्स आणि मुरुगन अश्विन चांगली गोलंदाजी करत आहेत.   बुमराहची कामगिरी सरासरी आहे. पण मुंबईचा चौथा आणि पाचवा गोलंदाज धावा देत आहे.  डेनियल सेम्स आणि पोलार्ड यांना धावा रोखण्यात अपयश मिळत आहे. मुंबईच्या पराभवाचं हेही महत्वाचं कारण आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget