एक्स्प्लोर

IPL 2022 : मुंबई नेमकी कुठे चुकली? सलग तीन पराभवाची  पाच कारणे 

IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईची पंधराव्या हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे.

IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईची पंधराव्या हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. मुंबईला सलग तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या दोन सामन्यात मुंबईचा निसटता पराभव झाला होता. मात्र अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कोलकाताने मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते. मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने पाच गडी आणि चार षटकं राखून केला. मुंबईच्या पराभवाची नेमकी कारण काय? 

रोहितचा फ्लॉप शो - 
मुंबईच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण कर्णधार रोहित शर्मा हा आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 41 धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी  करता आली नाही. तीन सामन्यात रोहित शर्माला फक्त 64 धावा काढता आल्या.  रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. 
 
फलंदाजीत सातत्य नाही - 
ईशान किशन आणि तिलक वर्मा वगळता एकाही फलंदाजाला फलंदाजीत सातत्य राखता आले नाही.  अनमोलप्रीत सिंह, टिम डेविड, कीरोन पोलार्ड आणि डेनियल सेम्स यांना आपल्या फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. तिसऱ्या सामन्यात तर अनमोलप्रीत आणि टिम डेविड यांना अंतिम अकरामधून बाहेर ठेवावं लागलं.  

संथ धावगती - 
तिन्ही सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी संथ गतीने धावा काढल्या. फलंदाज वेगाने धावसंख्या काढण्याऐवजी खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होते. आतापर्यंत एकाही फलंदाजाला विस्फोटक फलंदाजी करता आली नाही. मुंबईची धावगती प्रत्येक सामन्यात संथ राहिली आहे. तिसऱ्या सामन्यात पावर प्लेमध्ये एक विकेट गमावूनही 45  धावाच करु शकले. पराभवाचं हे एक मोठं कारण आहे.  

बुमराह रंगात नाही -
राजस्थान रॉयलविरोधातील अखेरचं षटक वगळलं तर आतापर्यंत बुमराहला आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. बुमराहच्या गोलंदाजीत ती धार दिसत नव्हती. पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात बुमराहची विकेटची पाटी कोरीच राहिली होती. फक्त राजस्थानविरोधात बुमराहला तीन विकेट घेता आल्या. त्याशिवाय बुमराह फ्लॉप राहिलाय.  

चौथ्या आणि पाचव्या गोलंदाजाची कमी - 
मुंबईच्या पराभवाच्या मागे गोलंदाजीही मोठं कारण आहे. टायमल मिल्स आणि मुरुगन अश्विन चांगली गोलंदाजी करत आहेत.   बुमराहची कामगिरी सरासरी आहे. पण मुंबईचा चौथा आणि पाचवा गोलंदाज धावा देत आहे.  डेनियल सेम्स आणि पोलार्ड यांना धावा रोखण्यात अपयश मिळत आहे. मुंबईच्या पराभवाचं हेही महत्वाचं कारण आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी

व्हिडीओ

Raju Patil On Shiv Sena Mns Alliance In KDMC :राज ठाकरेंनी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश दिले, राजू पाटलांची महिती
Samadhan Sarvankar Mumbai :भाजपच्या टोळीने पराभव केला,सरवणकर ठाम;सायबर विभागात तक्रार करणार
Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
निवडणुकीत शिवसेनेनं मोठा त्याग केला, कोल्हापूरचा महापौर शिवसेनेचाच होईल : राजेश क्षीरसागर
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
शिंदेंच्या शिवसेनेला मनसेचा पाठिंबा; बाळा नांदगावकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यात काहीही होऊ शकतं
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
भाजपकडून तानाजी सावंतांना दे धक्का; पक्षप्रवेश न होताच जिल्हा परिषदेसाठी पुतण्याला उमेदवारी
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
Share Market Today: सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
Embed widget