Bangladeshi Players, IPL 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) सुरू होण्यापूर्वी बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या काही कृती बीसीसीआय आणि आयपीएल फ्रँचायझींना आवडलेल्या नाहीत, अशा परिस्थितीत या दोन देशांच्या खेळाडूंवर आयपीएल 2024 म्हणजेच पुढच्या हंगामात बंदी घातली जाऊ शकते. या दोन्ही देशांनी आयपीएल दरम्यान आपापल्या द्विपक्षीय मालिका ठेवल्या आहेत, ज्यामुळे आयपीएल संघाचा भाग असलेले अनेक खेळाडू काही दिवस फ्रँचायझीपासून दूर राहणार आहेत.


IPL 2023 मध्ये शाकिब अल हसन, लिटन दास आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यासह फक्त तीन बांगलादेशी खेळाडू असतील आणि तिन्ही खेळाडू 9 एप्रिल ते 5 मे आणि पुन्हा 15 मे या कालावधीत त्यांच्या संबंधित IPL संघांसाठी उपलब्ध असतील. याशिवाय चारपैकी तीन श्रीलंकेचे खेळाडू 8 एप्रिलनंतरच आयपीएलसाठी उपलब्ध होतील. त्यात वनिंदू हसरंगा, मथिशा पाथीराना आणि महेश तिक्षाना हे खेळाडू आहेत. 8 एप्रिलपर्यंत श्रीलंका न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे.


'भविष्यात बांगलादेशी खेळाडूंबद्दलचा समज बदलेल'


'इनसाइड स्पोर्ट्स'शी बोलताना फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “जे आहे, तेच आहे. आम्ही तक्रार करू शकत नाही कारण बीसीसीआयच इतर बोर्डांशी चर्चा करते. पण, आता फ्रँचायझी ठराविक देशांतील खेळाडूंना निवडण्यापूर्वी थोडा विचार करेल. बघितलं तर तस्किन अहमदला एनओसी मिळाली नाही. त्यांना त्यांच्या खेळाडूंना खेळवायचे नसेल तर त्यांनी नोंदणी करू नये. साहजिकच बांगलादेशी खेळाडूंबाबतचा विचार भविष्यात बदलेल.''


स्थानिक मीडियाशी बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल म्हणाले, “मला या विषयावर वारंवार विचारण्यात आले आणि मी तेच उत्तर दिले आहे. आयपीएल लिलावासाठी बोलावले जाण्यापूर्वी आयपीएल अधिकाऱ्यांनी आम्हाला खेळाडूंच्या उपलब्धतेबद्दल विचारले आणि आम्ही त्यांना वेळापत्रक दिले. हे जाणून त्यांनी लिलाव पुढे केला. बांगलादेशच्या सामन्यांसाठी त्याच्याकडे उपलब्ध नसण्याचा पर्याय आहे असे मला वाटत नाही. आम्ही विचार करू, असे त्यांना सांगितले.''


सर्व काही खेळाडूंवर अवलंबून


हा सर्व मुद्दा लक्षात घेऊन बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “आपल्या बोर्डाला पटवणे हे पूर्णपणे खेळाडूंवर अवलंबून आहे. इंग्लंड, न्यूझीलंड आणि इतर प्रमुख मंडळांनी यासाठी मार्ग काढला आहे. आयपीएलची लोकप्रियता कोणीही नाकारू शकत नाही आणि खेळाडूंना सोडवून बोर्डालाही त्यांचा वाटा मिळतो. परंतु त्यांनी दुसरा काही निर्णय घेतल्यास, ते त्यांच्यावर आहे.


हे देखील वाचा-