एक्स्प्लोर

आशिया चषकाच्या विजयाने भारतीय संघावरील दबाव झाला कमी, विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार

Team India Asia Cup 2023 : विश्वचषकाआधी भारतीय संघ आशियाचा किंग झालाय. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला.

Team India Asia Cup 2023 : विश्वचषकाआधी भारतीय संघ आशियाचा किंग झालाय. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला. या सामन्यात मोहम्मद सिराज याने सहा विकेट घेतल्या. या विजयामुळे टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास सुकर झाल्याचे दिसतेय.  पाच ऑक्टोबर २०२३ पासून भारतामध्ये विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आठ ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाला सुरुवात होत आहे. आशिया चषकाआधी भारतीय संघाच्या कामगिरीबाबत दबाव होता. मात्र आता बऱ्याच अंशी दबाव कमी झाला आहे.

5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी रोहित आणि कंपनीवर दबाव होता. मात्र आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर दबाव कमीच झालाय.  अखेरच्या सुपर फोरच्या सामन्यात भारताचा बांगलादेशकडून ६ धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात टीम इंडिया 259 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्याआधी सुपर फोर सामन्यात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया २१३ धावांवर ऑलआऊट झाला होता. हा सामना भारताने 41 धावांनी जिंकला होता, पण फलंदाजीतील अपयश चर्चेत राहिले. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामनाही भारतासाठी काही खास नव्हता. मात्र पावसामुळे तो सामना रद्द झाला.

टीम इंडिया यंदा जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. येथे टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली.  भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली होती. वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. वनडे मालिकेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली होती. टीम इंडियाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय खेळाडूंना मैदानावर फलंदाजी करताना समस्यांना सामोरे जावे लागले होते. 29 जुलै रोजी बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १८१ धावांवर सर्वबाद झाला.

आशिया चषकाच्याआधी भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. रोहित शर्माच्या कर्णधारपद आणि फलंदाजीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज ही टीम इंडियाची पुन्हा समस्या झाली होती.  पण केएल राहुलच्या पुनरागमनाने ही समस्याही संपुष्टात आली. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात राहुलने शतक झळकावले होते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget