एक्स्प्लोर

आशिया चषकाच्या विजयाने भारतीय संघावरील दबाव झाला कमी, विश्वचषकासाठी टीम इंडिया तयार

Team India Asia Cup 2023 : विश्वचषकाआधी भारतीय संघ आशियाचा किंग झालाय. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला.

Team India Asia Cup 2023 : विश्वचषकाआधी भारतीय संघ आशियाचा किंग झालाय. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडिअमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा दहा विकेटने पराभव केला. या सामन्यात मोहम्मद सिराज याने सहा विकेट घेतल्या. या विजयामुळे टीम इंडियाचा विश्वचषकातील प्रवास सुकर झाल्याचे दिसतेय.  पाच ऑक्टोबर २०२३ पासून भारतामध्ये विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आठ ऑक्टोबरपासून आपल्या अभियानाला सुरुवात होत आहे. आशिया चषकाआधी भारतीय संघाच्या कामगिरीबाबत दबाव होता. मात्र आता बऱ्याच अंशी दबाव कमी झाला आहे.

5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्ड कप 2023 ची सुरुवात होणार आहे. विश्वचषकाआधी रोहित आणि कंपनीवर दबाव होता. मात्र आशिया चषकाच्या अंतिम सामन्यानंतर दबाव कमीच झालाय.  अखेरच्या सुपर फोरच्या सामन्यात भारताचा बांगलादेशकडून ६ धावांनी पराभव झाला होता. या सामन्यात टीम इंडिया 259 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्याआधी सुपर फोर सामन्यात श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया २१३ धावांवर ऑलआऊट झाला होता. हा सामना भारताने 41 धावांनी जिंकला होता, पण फलंदाजीतील अपयश चर्चेत राहिले. पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामनाही भारतासाठी काही खास नव्हता. मात्र पावसामुळे तो सामना रद्द झाला.

टीम इंडिया यंदा जुलै-ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली होती. येथे टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळली.  भारताने कसोटी मालिका १-० अशी जिंकली होती. वनडे मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. वनडे मालिकेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली होती. टीम इंडियाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय खेळाडूंना मैदानावर फलंदाजी करताना समस्यांना सामोरे जावे लागले होते. 29 जुलै रोजी बार्बाडोस येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १८१ धावांवर सर्वबाद झाला.

आशिया चषकाच्याआधी भारतीय संघाच्या विश्वचषकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. रोहित शर्माच्या कर्णधारपद आणि फलंदाजीबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. चौथ्या क्रमांकावरील फलंदाज ही टीम इंडियाची पुन्हा समस्या झाली होती.  पण केएल राहुलच्या पुनरागमनाने ही समस्याही संपुष्टात आली. पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात राहुलने शतक झळकावले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Embed widget