Shama Mohamed on Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने गट फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला हरवून सर्व तीन सामने जिंकले आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या शमा मोहम्मदने रोहित शर्माबाबत एक खळबळजनक विधान केले आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी रोहित शर्माला जाड्या कर्णधार म्हटले आहे. 

Continues below advertisement


काँग्रेस प्रवक्त्यांनी काय म्हणाल्या? 


सोशल मीडियावर हा वाद सुरू झाला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या शानदार विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेस आणि कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले - रोहित शर्मा जाड्या खेळाडू, वजन कमी करण्याची गरज आहे.


यासोबतच, शमा मोहम्मद म्हणाल्या की, तो आतापर्यंतचा सर्वात छाप न सोडणारा भारताचा कप्तान आहे, भाजपने काँग्रेस प्रवक्त्यांच्या विधानाला स्वनिर्मित चॅम्पियन (रोहित) यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.


शमा मोहम्मदने रोहित शर्माची तुलना माजी भारतीय क्रिकेट दिग्गजांशी केली. त्यांनी X वर लिहिले, 'सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, कपिल देव आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांच्या तुलनेत रोहित शर्मामध्ये इतके जागतिक दर्जाचे काय आहे?' तो एक सरासरी खेळाडू आणि कर्णधार आहे, पण नशिबाने तो भारतीय संघाचा कर्णधारपद बनला.


काँग्रेस प्रवक्त्यांच्या या विधानांवर भाजप नेते शहजाद पूनावाला म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 90 निवडणुका हरलेले आणि लोक रोहित शर्माच्या कर्णधारपदाला खराब म्हणत आहेत. पूनावाला यांनी रोहितच्या ट्रॅक रेकॉर्डचे कौतुक केले आणि त्याच्या टी-20 वर्ल्ड कप विजयाचा उल्लेख केला.


काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्या राधिका खेरा यांनी आरोप केला की, काँग्रेसने अनेक दशकांपासून खेळाडूंचा अपमान केला आहे, आणि आता ते एका क्रिकेट दिग्गजाची खिल्ली उडवत आहेत. राधिका म्हणाली- ही तीच काँग्रेस आहे जी दशकांपासून खेळाडूंचा अपमान करत होती, त्यांना मान्यता देत नव्हती आणि आता चॅम्पियनची खिल्ली उडवत आहे.


हे ही वाचा - 


Gautam Gambhir : त्यावेळी निर्णय घेताच चर्चा झाली, टीकाही भरपूर झाली, पण टीम इंडियाच्या वस्तादांनी एक डाव राखून ठेवला अन् बरोबर सेमीफायनलपूर्वी टाकला!