Natasa Stankovic Cryptic Post : टीम इंडियाचे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक वेगळे झाले आहेत. गेल्या महिन्यातच दोघांचे चार वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले. एका बातमीनुसार, हार्दिकला खूप ग्लॅमरस लाइफ आवडते आणि नताशाला हे सर्व आवडले नाही. त्यामुळे हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. नताशा सध्या तिचा मुलगा अगस्त्यासोबत सर्बियामध्ये आहे आणि सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. हार्दिकची माजी पत्नी अनेकदा पोस्ट शेअर करत असते. यावेळीही असेच काहीसे पाहायला मिळाले.


नताशा स्टॅनकोविचने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली. तिने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये प्रेम म्हणजे काय हे लिहिले आहे. 'प्रेम शांती असते, प्रेम दयाळू असते. तो मत्सर करत नाही, प्रेम अभिमान बाळगत नाही, यामुळे इतरांचा अपमान होत नाही. प्रेम आत्मा शोधत नाही, तो सहजासहजी संतप्त होत नाही. प्रेम चुकीच्या गोष्टीची नोंद ठेवत नाही, परंतु सत्यात आनंदित होते. हे नेहमीच संरक्षण करते, नेहमी विश्वास ठेवते, नेहमी आशा ठेवते, नेहमीच टिकते, प्रेम कधीही अपयशी ठरत नाही...', नताशाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.


दोघेही का झाले वेगळे?


हार्दिक पांड्याने जुलै महिन्यात पत्नी नताशा स्टॅनकोविक हिला घटस्फोट दिला. हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोटाची पुष्टी केली तेव्हा दोघांनीही त्यांच्या वेगळे होण्यामागचे कारण सार्वजनिक केले नव्हते. पण नुकतेच एका रिपोर्टमध्ये एका सूत्राच्या हवाल्याने नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्या यांच्या घटस्फोटाचे संभाव्य खरे कारण समोर आले आहे. अहवालानुसार, नताशा हार्दिकच्या व्यक्तिमत्त्वाशी ताळमेळ राखू शकली नाही. नताशाने नातेसंबंध सुधारण्यासाठी आणि गोष्टी हाताळण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु अपयशी ठरली. त्यामुळेच त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला.


दरम्यान, हार्दिक पांड्या सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या परदेश दौऱ्यावर गेला आहे. पण तो कोणासोबत फिरतोय हे सांगता येत नाही. नुकतेच त्याने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो ट्रेनमध्ये बसलेला दिसत आहे. सध्या त्याचे नाव ब्रिटीश गायिका जास्मिन वालियासोबत जोडले जात आहे. पण ही बातमी किती खरे आहे हे माहित नाही.


हे ही वाचा : 


बांगलादेश मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का! जडेजा अन् सिराज दुलीप ट्रॉफीतून बाहेर, मोठे कारण आले समोर