एक्स्प्लोर

IND vs BAN: पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाची तर बांगलादेशच्या पराभवाची प्रमुख कारणं कोणती, वाचा सविस्तर

India vs Bangladesh : भारतानं बांगलादेश दौऱ्यातील (India tour of bangladesh) कसोटी मालिकेची विजयानं सुरुवात केली असून पहिला सामना भारतानं 188 धावांनी जिंकला आहे.

IND vs BAN 1st Test Win reasons : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं तब्बल 188 धावांनी विजय मिळवला आहे.या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली,  दरम्यान भारताच्या या दमदार विजयामागील तसंच बांगलादेशच्या पराभवामागील प्रमुख कारण जाणून घेऊ...  

भारताच्या विजयाची कारणं

1.दमदार फलंदाजीचं प्रदर्शन

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं शानदार फलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा, गिल, अय्यर, अश्विन आणि कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो केलं. भारताकडून या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी शतकं झळकावली. या दोन्ही फलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी करत सामन्यातील भारताची स्थिती मजबूत केली. तर पहिल्या डावात श्रेयस-पुजारानं मोठी भागिदारी करत कुलदीप-अश्विननं एक संयमी खेळी केली.

2.गोलंदाजीत कुलदीप, अक्षरसह सिराजची कमाल

सामन्यात फलंदाजीसोबतच टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. संघासाठी पहिल्या डावात दमदार पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचे कंबरडे मोडले. सामन्यात कुलदीप यादवने एकूण 8, अक्षर पटेलने 5 आणि मोहम्मद सिराजने एकूण 4 बळी घेतले.

बांगलादेशच्या पराभवाची कारणं

1.खराब फलंदाजी 

बांगलादेश संघाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची पहिल्या डावातील फलंदाजी. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात बांगलादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खूप संघर्ष करताना दिसले. विशेष म्हणजे पहिल्या डावात बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडाही गाठता आला नव्हता. स्वस्तात पहिला डाव गडगडल्यामुळे भारताने बांगलादेशवर मोठी आघाडी घेतली आणि अखेर सामना जिंकला.

सुमार गोलंदाजी 

बांगलादेश संघाच्या पराभवाचं आणि एक प्रमुख कारण म्हणजे संघाची सुमार गोलंदाजी.  पहिल्या डावात बांगलादेश संघाने टीम इंडियाच्या 4 प्रमुख फलंदाजांना केवळ 112 धावांवर बाद केले. बांगलादेशी संघ भारताला मोठी धावसंख्या करू देणार नाही, असं वाटत होतं. मात्र यानंतर पुजारा आणि अय्यरने मोठी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्यानंतर, दुसऱ्या डावातही बांगलादेशी गोलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. त्यांना टीम इंडियाचे केवळ 2 विकेट घेता आले. बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा घेत भारताने सामना जिंकला.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती

व्हिडीओ

Khopoli Crime खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची हत्या, राजकीय सूडापोटी मंगेश काळोखेंची हत्या?
Sudhir mungantiwar Vs Jorgewar : जोरगेवार-मुनगंटीवारांमधला सुप्त संघर्ष कधी संपणार? Special Report
Ganpati Santa Claus : गणपतीला सांताक्लॉजची टोपी घातल्यानं वादंग Special Report
Mahayuti Seat Sharing : मनपासाठी महायुतीचं कुठे ठरलं कुठे अडलं? Special Report
Social Media Ban Update : भारतातही 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताचा तिसऱ्या टी 20 श्रीलंकेवर दणदणीत विजय, शफाली वर्माची वादळी फलंदाजी, मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी
शफाली वर्माची वादळी फलंदाजी, भारताचा श्रीलंकेवर 8 विकेटनं विजय, आणखी एक मालिका जिंकली
Dhule Municipal Corporation Election 2026 : धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? मतदारांची संख्या, वॉर्डनिहाय आरक्षण सर्व माहिती
धुळे महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम, भाजपकडे मोठ्या संख्येनं इच्छुक, काँग्रेस आव्हान देणार? संपूर्ण माहिती
Pune : मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
मोठी बातमी! घड्याळ की तुतारी? दोन्ही राष्ट्रवादीची पुण्यातील युती फिस्कटली, चिन्हावरून मतभेद झाल्याची सूत्रांची माहिती
Ajit Pawar : अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
अजितदादा भाजपसाठी 'ट्रोझन हॉर्स'? भाजप विरोधी, धर्मनिरपेक्ष मतं घेऊन विरोधकांची स्पेस संपवून टाकण्याची रणनीती
BMC Election 2025-26 : उद्धव ठाकरे- राज ठाकरे, भाजप अन् शिवसेनेपूर्वी समाजवादी पार्टीनं आघाडी घेतली, मुंबई महापालिकेसाठी पहिली यादी जाहीर
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर, समाजवादी पक्षाकडून मोठी घोषणा
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
हे सरकार परवडणारे आहे का? आपण पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, दाखवण्यासारखं काही नाही म्हणून जातीय तेढ निर्माण करतात; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
केरळमध्ये भाजपचा पहिला महापौर विराजमान; राज्यातील पहिल्या निवृत्त महिला आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा असताना कोणाला संधी मिळाली?
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
नातवाच्या हत्येनंतर न्यायालयीन कोठडीत असलेला कुख्यात गुंड बंडू आंदेकर पुणे मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात, पण 'या' अटी पाळाव्याच लागणार!
Embed widget