एक्स्प्लोर

IND vs BAN: पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाची तर बांगलादेशच्या पराभवाची प्रमुख कारणं कोणती, वाचा सविस्तर

India vs Bangladesh : भारतानं बांगलादेश दौऱ्यातील (India tour of bangladesh) कसोटी मालिकेची विजयानं सुरुवात केली असून पहिला सामना भारतानं 188 धावांनी जिंकला आहे.

IND vs BAN 1st Test Win reasons : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं तब्बल 188 धावांनी विजय मिळवला आहे.या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली,  दरम्यान भारताच्या या दमदार विजयामागील तसंच बांगलादेशच्या पराभवामागील प्रमुख कारण जाणून घेऊ...  

भारताच्या विजयाची कारणं

1.दमदार फलंदाजीचं प्रदर्शन

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं शानदार फलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा, गिल, अय्यर, अश्विन आणि कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो केलं. भारताकडून या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी शतकं झळकावली. या दोन्ही फलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी करत सामन्यातील भारताची स्थिती मजबूत केली. तर पहिल्या डावात श्रेयस-पुजारानं मोठी भागिदारी करत कुलदीप-अश्विननं एक संयमी खेळी केली.

2.गोलंदाजीत कुलदीप, अक्षरसह सिराजची कमाल

सामन्यात फलंदाजीसोबतच टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. संघासाठी पहिल्या डावात दमदार पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचे कंबरडे मोडले. सामन्यात कुलदीप यादवने एकूण 8, अक्षर पटेलने 5 आणि मोहम्मद सिराजने एकूण 4 बळी घेतले.

बांगलादेशच्या पराभवाची कारणं

1.खराब फलंदाजी 

बांगलादेश संघाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची पहिल्या डावातील फलंदाजी. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात बांगलादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खूप संघर्ष करताना दिसले. विशेष म्हणजे पहिल्या डावात बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडाही गाठता आला नव्हता. स्वस्तात पहिला डाव गडगडल्यामुळे भारताने बांगलादेशवर मोठी आघाडी घेतली आणि अखेर सामना जिंकला.

सुमार गोलंदाजी 

बांगलादेश संघाच्या पराभवाचं आणि एक प्रमुख कारण म्हणजे संघाची सुमार गोलंदाजी.  पहिल्या डावात बांगलादेश संघाने टीम इंडियाच्या 4 प्रमुख फलंदाजांना केवळ 112 धावांवर बाद केले. बांगलादेशी संघ भारताला मोठी धावसंख्या करू देणार नाही, असं वाटत होतं. मात्र यानंतर पुजारा आणि अय्यरने मोठी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्यानंतर, दुसऱ्या डावातही बांगलादेशी गोलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. त्यांना टीम इंडियाचे केवळ 2 विकेट घेता आले. बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा घेत भारताने सामना जिंकला.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs SRH Live Score : IPL च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने जिंकली नाणेफेक, हैदराबादविरुद्ध रजत पाटीदारचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
IPL 2026 Live Update : IPL च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने जिंकली नाणेफेक, हैदराबादविरुद्ध रजत पाटीदारचा मोठा निर्णय, जाणून घ्या प्लेइंग-11
CSK Playing 11 : MS धोनी OUT, संजू सॅमसन विकेटकीपर, तर... अशी असणार चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी प्लेइंग-11
MS धोनी OUT, संजू सॅमसन विकेटकीपर, तर... अशी असणार चेन्नई सुपर किंग्सची हादरवणारी प्लेइंग-11
MS Dhoni OUT From IPL 2026 : MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ
MS धोनीला काय झालं?, माहीचं हे रूप कधीच पाहिलं नसेल; 3 व्हिडिओनी सोशल मीडियावर उडवून दिली खळबळ
BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?
BCCIच्या धाकाने बांगलादेशचा माज उतरला; IPL बंदीचा निर्णय कचऱ्याच्या पेटीत, एका रात्रीत नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न
Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; चौकशीसाठी समिती गठीत
Kolhapur News: कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
कोल्हापुरात गर्भलिंग निदान करणाऱ्या डाॅ. युवराज पाटील टोळीकडून सैतानी कृत्य; डॉक्टरनेच एजंटांचं जाळ पसरवून आईच्या गर्भातच लेकी संपवल्या; भ्रूणाची विल्हेवाट लावण्यासाठी सुद्धा स्वतंत्र 'व्यवस्था'
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
माये गं माये... लेकरांना पाठीवर घेऊन अस्वल मातेची 2-3 किमी पायपीट, अमरावतीतील प्रेमळ व्हिडिओ व्हायरल
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आजही होऊ शकते, पण मुळात चर्चेसाठी येण्याची गरज; वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
Embed widget