एक्स्प्लोर

IND vs BAN: पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या विजयाची तर बांगलादेशच्या पराभवाची प्रमुख कारणं कोणती, वाचा सविस्तर

India vs Bangladesh : भारतानं बांगलादेश दौऱ्यातील (India tour of bangladesh) कसोटी मालिकेची विजयानं सुरुवात केली असून पहिला सामना भारतानं 188 धावांनी जिंकला आहे.

IND vs BAN 1st Test Win reasons : भारत विरुद्ध बांगलादेश (India vs bangladesh) पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं तब्बल 188 धावांनी विजय मिळवला आहे.या विजयासह भारतानं मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियानं सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये 404 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 258 रन्स केले. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या 150 धावांत आटोपला. ज्यानंतर बांगलादेशनं दुसऱ्या डावात झुंज दिली पण ते केवळ 324 धावा करु शकले. ज्यामुळे भारतानं 188 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियानं या मॅचमध्ये बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली,  दरम्यान भारताच्या या दमदार विजयामागील तसंच बांगलादेशच्या पराभवामागील प्रमुख कारण जाणून घेऊ...  

भारताच्या विजयाची कारणं

1.दमदार फलंदाजीचं प्रदर्शन

पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियानं शानदार फलंदाजी केली. सामन्याच्या पहिल्या डावात पुजारा, गिल, अय्यर, अश्विन आणि कुलदीप यादव यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांना सळो की पळो केलं. भारताकडून या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी शतकं झळकावली. या दोन्ही फलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात शानदार शतकी खेळी करत सामन्यातील भारताची स्थिती मजबूत केली. तर पहिल्या डावात श्रेयस-पुजारानं मोठी भागिदारी करत कुलदीप-अश्विननं एक संयमी खेळी केली.

2.गोलंदाजीत कुलदीप, अक्षरसह सिराजची कमाल

सामन्यात फलंदाजीसोबतच टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही चमकदार कामगिरी केली. संघासाठी पहिल्या डावात दमदार पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवने पाच विकेट्स आपल्या नावावर केल्या. त्याचवेळी सिराजने आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशचे कंबरडे मोडले. सामन्यात कुलदीप यादवने एकूण 8, अक्षर पटेलने 5 आणि मोहम्मद सिराजने एकूण 4 बळी घेतले.

बांगलादेशच्या पराभवाची कारणं

1.खराब फलंदाजी 

बांगलादेश संघाच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची पहिल्या डावातील फलंदाजी. भारताचा पहिला डाव 404 धावांवर आटोपल्यानंतर बांगलादेशचा संघ पहिल्या डावात अवघ्या 150 धावांत सर्वबाद झाला. पहिल्या डावात बांगलादेशी फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर खूप संघर्ष करताना दिसले. विशेष म्हणजे पहिल्या डावात बांगलादेशच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडाही गाठता आला नव्हता. स्वस्तात पहिला डाव गडगडल्यामुळे भारताने बांगलादेशवर मोठी आघाडी घेतली आणि अखेर सामना जिंकला.

सुमार गोलंदाजी 

बांगलादेश संघाच्या पराभवाचं आणि एक प्रमुख कारण म्हणजे संघाची सुमार गोलंदाजी.  पहिल्या डावात बांगलादेश संघाने टीम इंडियाच्या 4 प्रमुख फलंदाजांना केवळ 112 धावांवर बाद केले. बांगलादेशी संघ भारताला मोठी धावसंख्या करू देणार नाही, असं वाटत होतं. मात्र यानंतर पुजारा आणि अय्यरने मोठी भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले. त्यानंतर, दुसऱ्या डावातही बांगलादेशी गोलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. त्यांना टीम इंडियाचे केवळ 2 विकेट घेता आले. बांगलादेशच्या कमकुवत गोलंदाजीचा फायदा घेत भारताने सामना जिंकला.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KKR Playoff Equation IPL 2026 : ...तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL इतिहासातील सर्वात कठीण समीकरण
...तर थेट गेम ओव्हर! कोलकाताला प्लेऑफसाठी इतक्या ओव्हर्समध्येच उरकावा लागणार मॅच; KKR समोर IPL इतिहासातील सर्वात कठीण समीकरण
Sara Tendulkar On Arjun : शेवटचा सामना, शेवटची संधी... अन् शेवटी अर्जुनला मैदानात पाहून वडील सचिननंतर बहीण सारा तेंडुलकरही भावूक, लिहिली लांबलचक पोस्ट
शेवटचा सामना, शेवटची संधी... अन् शेवटी अर्जुनला मैदानात पाहून वडील सचिननंतर बहीण सारा तेंडुलकरही भावूक, लिहिली लांबलचक पोस्ट
Rishabh Pant IPL 2026 : आधी टीम इंडियाचं उपकर्णधारपद गेलं, आता IPL मधूनही हकालपट्टी? 27 कोटींचा कॅप्टन ऋषभ पंतवर LSG करणार मोठी कारवाई?
आधी टीम इंडियाचं उपकर्णधारपद गेलं, आता IPL मधूनही हकालपट्टी? 27 कोटींचा कॅप्टन ऋषभ पंतवर LSG करणार मोठी कारवाई?
MI vs RR Live Score Updates : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकली नाणेफेक; हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय, जाणून घ्या Live अपडेट्स
MI vs RR Live Score Updates IPL 2026 : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध जिंकली नाणेफेक; हार्दिक पांड्याचा मोठा निर्णय, जाणून घ्या Live अपडेट्स

व्हिडीओ

Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
Video: इन्स्टाग्राम अकाऊंट परत मिळताच कॉकरोच संस्थापक अभिजितने थेट फॉलोअरची माहिती शेअर केली; म्हणाला, 94 टक्के भारतीय, 'मग रिजिजू त्यांना पाकिस्तानी का म्हणत आहेत?'
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
मोटेगावकरांचा तांब्यातून विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडण्याचा व्हिडिओ व्हायरल; अंनिसचा संताप, कसून चौकशीची मागणी
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
सरपंचांनी शतकी तडाखा देत पंजाबला सुद्धा तारलं, पण इकडं सूर्याचा थेट करेक्ट कार्यक्रम झाला; सगळा डाव आता गुरुजींच्या हातात!
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
आण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं कौतुक, सरकारला सल्लाही दिला; मंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
Raigad News: रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
रायगडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस, 6 वर्षीय चिमुरड्यासह तब्बल आठ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
Iran War Live Update: अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
अमेरिकेला युरेनियम देण्यास इराणचा स्पष्ट नकार; ट्रम्पच्या दाव्यांची पुन्हा एकदा पोलखोल; शांतता करारात नेमकं ठरलं तरी काय?
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
राज्यात पेट्रोल-डिझेलचा साठा भरपूर, शेतकऱ्यांनी विनाकारण घाई करू नये; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन
Titwala Crime news: टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
टिटवाळ्यात लिव्ह इन रिलेशनचा भयंकर अंत, गर्लफ्रेंडला घरी बोलावून घेतलं, टीव्ही अन् पाण्याने भरलेला हंडा डोक्यात टाकला अन्...
Embed widget