एक्स्प्लोर

Asia Cup 2023 : पावसानंतर सामना सुरु झाला तर पाकिस्तानला किती टार्गेट मिळणार?

India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली.

India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात दोन बाद 356 धावांपर्यंत मजल मारली. रविवारी पावसामुळे सामना होऊ शकला नव्हता, आज म्हणजेच राखीव दिवशी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे सामना उशीरा सुरुवात झाला, पण त्यानंतर विराट आणि राहुल यांनी शतके ठोकली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. इमाम उल हक आणि बाबर आझम लगेच तंबूत परतले. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा पाकिस्तानने दोन बाद 44 धावा केल्या आहेत. कोलंबोमध्ये पावसामुळे प्रेमदासा स्टेडिअमवर कव्हर्स टाकण्यात आले आहेत. सामना सुरु झाला अन् षटके कमी करण्यात आली तर पाकिस्तानला मोठं आव्हान मिळू शकते. 

डकवर्थ लुईस नियमांनुसार, जर पाकिस्तान संघाला 20 षटके फलंदाजी करण्याची संधी मिळाली तर 200 धावांचे आव्हान मिळू शकते. म्हणजे, पाकिस्तानला आणखी 9 षटकात 156 धावा कराव्या लागतील. डकवर्थ लुईस नियमांनुसार, पाकिस्तानला 22 षटकात 226 धावांचे आव्हान मिळू शकते. तर 24 षटकानंतर 230, 26 षटकात 244 धावांचे आव्हान मिळू शकते. 25 षटकांमध्ये 237 धावांचे आव्हान मिळू शकते. तर 30 षटकांत 267 धावांचे आव्हान मिळू शकते. 10.30 पर्यंत सामना सुरु झाल्यास 20 षटकांचा सामना होऊ शकतो. 

पावसामुळे आजही सामना झाला नाही तर भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघाला प्रत्येकी एक एक गुण दिले जातील. अशा स्थितीत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहचण्याची शक्यता जास्त आहे. पाकिस्तान संघाने सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. त्यांचा अखेरचा सामना श्रीलंकाविरोधात आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

भारताने दिलेल्या 357 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इमाम उल हक स्वस्तात बाद झाला. अवघ्या 17 धावांवर पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्यानंतर 43 धावसंख्येवर दुसरा धक्का बसला. बाबर आझम याला हार्दिक पांड्याने स्वस्तात तंबूत पाठवले. तर इमामचा अडथळा बुमराहने दूर केला.  

कोहली-राहुलची द्विशतकी भागिदारी

शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी शतकी भागिदारी करत पाया रचला. त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. दोघांनी 194 चेंडूमध्ये  233 धावांची भागिदारी केली.  विराट कोहली याने 94 चेंडूमध्ये नाबाद 122 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये विराट कोहलीने 9 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तर केएल राहुल याने 106 चेंडूत 111 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 2 षटकार ठोकले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget