India vs Bangladesh 1st Test Playing 11 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याचबरोबर विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांचेही कसोटी संघात पुनरागमन होत आहे. आता मोठा प्रश्न असा आहे की चेन्नई कसोटी सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कर्णधार रोहित शर्मा कोणत्या खेळाडूंना संधी देणार? आता टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधील एका जागेसाठी तीन दावेदार पुढे येत आहेत.


जागा 1, दावेदार 3


अहवालानुसार, चेपॉकमधील पहिल्या कसोटी सामन्यासाठी काळ्या मातीची खेळपट्टी असू शकते. असे झाल्यास टीम इंडियाचे लक्ष फिरकी गोलंदाजांवर अधिक असेल. यानंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार हे पाहायचे आहे. याशिवाय खेळपट्टी लाल मातीची असेल तर गोलंदाजांची निवड करणे कर्णधार आणि प्रशिक्षकासाठी डोकेदुखी ठरणार आहे.


भारत आणि बांगलादेश पहिल्या कसोटी सामन्यासाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आता एका जागेसाठी कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि आकाश दीप यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.


अहवालानुसार, दक्षिण भारतात मुसळधार पावसामुळे खेळपट्टीमध्ये ओलावा असू शकतो, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होऊ शकतो. त्यामुळे पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाजांची भूमिका थोडी अधिक महत्त्वाची असू शकते.


याशिवाय, तिसऱ्या दिवसापासून फिरकीपटूंना मदत मिळताना दिसू शकते, कारण तिसऱ्या दिवसापासून खेळपट्टीत काही क्रॅक दिसू शकतात. भारतीय संघाने शेवटचा कसोटी सामना 2021 साली इंग्लंडसोबत चेन्नई येथे खेळला होता. या सामन्यात फिरकी गोलंदाजांना मोठी मदत मिळाली. त्या सामन्यात फिरकी गोलंदाजांनी 32 विकेट घेतल्या होत्या.


हे ही वाचा - 


IPL 2025 Mega Auction : RCB मेगा लिलावात 'या' खेळाडूंवर खेळणार डाव.... विराट कोहली पहिल्यांदा जिंकणार IPL ट्रॉफी?


Ishan Kishan : 14 चौकार, 3 षटकार अन् खणखणीत शतक, इशान किशनने टीकाकारांना दोन शब्दांत दिले चोख प्रत्युत्तर, पोस्ट व्हायरल


तेजस्वी यादव यांनी किती धावा केल्या, किती विकेट्स घेतल्या?; IPL मध्ये किती रुपयांची बोली लागली?, जाणून घ्या