Womens Asia Cup 2022 Final: महिला आशिया चषक 2022 मधील अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ विकेट्सनं धुव्वा उडवला. या विजयासह भारतानं सातव्यांदा महिला आशिया चषकावर नाव कोरलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं भारतीय गोलंदाज रेणुका सिंह (Renuka Singh), राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) आणि स्नेह राणाच्या (Sneh Rana) भेदक माऱ्यासमोर गुडघे टेकले. श्रीलंकेनं 20 षटकात 9 विकेट्स गमावून भारतानंसमोर 66 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना 8.3 षटकातच जिंकला.


श्रीलंकेनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर स्मृती मानधनासोबत सलामीला आलेली शेफाली वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात आऊट झाली. त्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्जही स्वस्तात माघारी परतली. मात्र, स्मृती मानधानानं दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी सुरूच ठेवली. तिनं या सामन्यात अवघ्या 25 चेंडूत नाबाद अर्धशतकीय खेळी केली. तर, कर्णधार हरमनप्रीत कौरनं नाबाद 11 धावांची खेळी केली. भारतानं हा सामना 8 विकेट्स राखून जिंकला. श्रीलंकेकडून इनोका रनावीरा आणि कविशा दिल्हारी यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.


ट्वीट-




 


भारताची भेदक गोलंदाजी
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय महिलांनी त्यांचा हा निर्णय साफ चूकीचा ठरवत सुरुवातीपासून एक-एक श्रीलंकेच्या फलंदाजांना तंबूत धाडायला सुरुवात केली. श्रीलंकेच्या संघानं दुहेरी संख्या गाठण्याआधीच त्यांचे 4 फलंदाज तंबूत पोहोचले होते. श्रीलंकेकडून केवळ ओशादी रणसिंघेने 13 आणि इनोका रणवीराने नाबाद 18 धावा केल्यामुले त्यांनी 65 धावांपर्यंत मजल मारली. ज्यामुळे भारताला विजयासाठी आता 66 धावांची गरज आहे. भारताच्या महिला गोलंदाजांनी तर उत्तम कामगिरी केली. यावेळी रेणुका सिंहनं सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, तर रनआऊट करण्यातही तिनं मोलाची कामगिरी केली. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 


हे देखील वाचा-