India vs West Indies Toss Update : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आज चौथा टी20 सामना पार पडत आहे. नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. वेस्ट इंडीजने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला आणि तिसरा सामना जिंकत 2-1 ची आघाडी घेतली आहे. पण आतापर्यंत वेस्ट इंडीजने देखील तगडा खेळ दाखवल्यामुळे भारतीय संघासमोर आव्हान आहे.



आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत विजयी आघाडी घेईल. तर वेस्ट इंडीज आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. भारताला कमी धावांमध्ये रोखून मग लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचा निर्धार वेस्ट इंडीजचा असणार आहे.  अंतिम 11 चा विचार करता भारताने तीन महत्त्वाचे बदल केले आहेत. श्रेयस अय्यर, रवीचंद्रन आश्विन आणि हार्दीक पांड्या यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी संजू सॅमसन, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना संघात जागा मिळाली आहे.  



भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक हुडा, अक्षर पटेल,दिनेश कार्तिक, आवेश खान, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह 




वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, डॉमनिक ड्रेक्स, ओबेद मकॉय, डेवॉन थॉमस, अल्झारी जोसेफ, अकेल हुसेन.   



हे देखील वाचा-