Ind vs Eng 4th Test Day 5 : मँचेस्टर कसोटी अनिर्णित, गिलनंतर जडेजा अन् सुंदर यांनी ठोकली शतके; इंग्लंड 1-2 ने आघाडीवर
India vs England Day 5 Live Latest Updates : मँचेस्टर कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. भारताला पराभव टाळायचा असेल, तर शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.
किरण महानवरLast Updated: 27 Jul 2025 10:15 PM

पार्श्वभूमी
India vs England Day 5 Live Latest Updates : मँचेस्टर कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. भारताला पराभव टाळायचा असेल, तर शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सध्या सर्वांची...More
India vs England Day 5 Live Latest Updates : मँचेस्टर कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आहे. भारताला पराभव टाळायचा असेल, तर शेवटच्या दिवशी चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. सध्या सर्वांची आशा कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर के.एल. राहुलवर टिकून आहे. चौथ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 174 धावा केल्या आहेत, पण अजूनही ते इंग्लंडच्या 137 धावांनी पिछाडीवर आहेत.पहिले सत्र ठरणार निर्णायकपाचव्या दिवसाचे पहिले सत्र भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जर गिल आणि राहुल हे दोघे सत्रभर खेळत राहिले, तर भारतासाठी सामना वाचवणं सोपं होईल आणि सामना ड्रॉ होण्याची शक्यता वाढेल. पण जर भारत पराभूत झाला, तर ही मालिका देखील गमावावी लागेल.पावसाची शक्यता आणि स्टोक्सची अनुपस्थितीसामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे, त्यामुळे भारताला दिलासा मिळू शकतो. तसेच इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स दुखापतीमुळे शेवटच्या दिवशी गोलंदाजी करु शकणार नाही, अशी शक्यता आहे. स्टोक्सने पहिल्या डावात 5 विकेट घेतले होते आणि या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत.उपकर्णधार जखमी असतानाही फलंदाजीसाठी तयारया दरम्यान, भारताचा उपकर्णधार जरी जखमी असला तरी गरज भासल्यास तो फलंदाजीस उतरेल, अशी माहिती भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मँचेस्टर कसोटी अनिर्णित, गिलनंतर जडेजा अन् सुंदर यांनी ठोकली शतके; इंग्लंड 1-2 ने आघाडीवर
भारतीय संघाने रविवारी इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळवलं. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 669 धावांची मजल मारत भारतावर 311 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात के. एल. राहुल – शुभमन गिल आणि नंतर रवींद्र जडेजा – वॉशिंग्टन सुंदर यांच्यात झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने अंतिम दिवशी दुसऱ्या डावात आघाडी घेतली आणि इंग्लंडच्या विजयाच्या आशा पूर्णपणे उधळून लावल्या. भारताने दुसऱ्या डावात केवळ 4 गडी गमावत 425 धावा केल्या.