एक्स्प्लोर

ICC Womens T20 World Cup 2020 | सलामीच्या सामन्यात भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने

महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाला आजपासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होत आहे. सिडनीच्या सलामीच्या साखळी सामन्यात भारतीय महिलांची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडेल. यंदाच्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया हेच दोन बलाढ्य संघ आहेत. त्याच दोन संघांत विश्वचषकाची फायनल होईल, असा अंदाज आहे. त्यामुळेच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या साखळी सामन्याकडे फायनलची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे.

सिडनी : हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आणि एलिस पेरीची ऑस्ट्रेलियन फौज. या दोन तुल्यबळ संघांच्या लढतीने आयसीसीच्या महिला ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाचं बिगुल वाजणार आहे. सिडनी क्रिकेट स्टेडियमवर उभय संघांमध्ये विश्वचषकाचा सलमीचा सामना खेळवण्यात येणार आहे. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागलेल्या भारतीय संघाने यंदा चांगलीच कंबर कसली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही आपलं विजेतपद कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.

यंदाच्या विश्वचषकात भारताचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. या गटातून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. विश्वचषकाच्या या आव्हानाला सामोरं जाताना भारतीय संघाची मदार असेल ती प्रामुख्याने स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरवर. स्मृती आणि हरमनला ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. बिग बॅशमध्ये या दोघीही अनुक्रमे ब्रिस्बेन हीट आणि सिडनी थंडर्स संघाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे स्मृती आणि हरमनकडून भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. शेफाली वर्मा आणि मुंबईची जेमिमा रॉड्रिग्स या ताज्या दमाच्या फलंदाजांचं योगदानही मोलाचं ठरेल. तर दिप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूनम आणि राधा यादव यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहिल. 2017 च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आणि 2018 च्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताला विजेतेपदाने थोडक्यात हुलकावणी दिली होती. पण यावेळी नव्या आत्मविश्वासाने स्पर्धेला सामोरं जाण्याचा मानस विश्वचषकासाठी निघण्यापूर्वी स्मृती मानधनाने एबीपी माझाकडे व्यक्त केला होता. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय महिलांना आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरचा सध्याचा ते स्वप्न यंदा साकारणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Embed widget