ICC T20 WC 2021, IND vs NAM: भारत आणि नामिबिया यांच्यात आज दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) विश्वचषकातील 42 वा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या विश्वचषकात निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा शेवट गोड व्हावा, अशी अनेकांची अपेक्षा आहे. भारतासाठी आजचा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. तर, विश्वचषकाच्या सुपर-12 मध्ये एकही सामना जिंकता न आलेला नामिबियाचा संघही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात असणार आहे.


नामिबियाविरोधात भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी या प्रमुख गोलंदाज दिसतील. या सामन्यादत फिरकीपटू राहुल चहरला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


टी-20 विश्वचषकातील 40 व्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं अफगाणिस्तानच्या संघाला धुळ चाखली आणि टीम इंडियाचं पॅक अप झालं. टीम इंडियाचं विश्वचषकावर नाव कोरण्याचं यंदाचं स्वप्न भंगलं. टीम इंडिया विश्वचषकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. काही फॅन्स सोशल मीडियावरुन टीम इंडियाला ट्रोल करत आहेत. यामध्ये माजी क्रिकेटर विरेंद्र सिंह सेहवागचाही समावेश आहे. सेहवागनंही टीम इंडियाला कोपरखळी मारली आहे. सेहवागनं एक मीम शेअर करत लिहिलं आहे की, 'खतम, बाय-बाय, टाटा, गुड बाय'


हे देखील वाचा-