मुंबई : श्रीलंकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या तिरंगी मालिकेसाठी बीसीसीआयनं विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीसह प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि श्रीलंका संघांसह या मालिकेत बांगलादेशचा समावेश आहे.


येत्या 6 ते 18 मार्च या कालावधीत या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. विराट आणि धोनीसह कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या यांच्यासारख्या प्रमुख गोलंदाजांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय गोलंदाजांवर आलेला ताण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.