Indea Beat England : रोहित शर्माच्या टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली!
रोहित शर्माच्या टीम इंडियाने रांची कसोटीतही तिरंगा फडकावून, इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका खिशात टाकली. (Photo Credit : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलामीवीर शुभमन गिलचं संयमी अर्धशतक आणि ध्रुव जुरेलची पुन्हा चमकदार खेळीमुळे भारताने चौथ्या कसोटीत इंग्लंडवर 5 विकेट्स राखून विजय मिळवला. (Photo Credit : PTI)
चौथ्या कसोटीत ब्रिटिशांनी भारतीय क्रिकेट संघासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. टीम इंडियानं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. मात्र आज आघाडीची पडझड झाल्यानंतर टीम इंडिया संकटात आली होती, पण शुभमन गिल आणि ध्रुव जुरेल यांनी जबरदस्त खेळी खेळत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. (Photo Credit : PTI)
टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी इंग्लंडला दुसऱ्या डावात लवकर गुंडाळत कसोटीत वापसी केली होती. विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन उतरल्यानंतर यशस्वी आणि रोहितने 84 धावांची सलामी दिली होती. मात्र, त्यानंतर 36 धावांत पाच विकेट गमावल्याने टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती, त्यानंतर गिल आणि ध्रुव जुरेलने संयमी खेळी खेळत विजय मिळवला. (Photo Credit : PTI)
तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल 37 धावांवर बाद झाला. यानंतर कॅप्टन रोहित शर्माही 55 धावा करून बाद झाला. यानंतर रजत पाटीदार पुन्हा अपयशी ठरल्याने टीम इंडियाची अवस्था 3 बाद 100 अशी झाली. (Photo Credit : PTI)
उपहारापूर्वी टीम इंडियाने 3 बाद 118 अशी मजल मारली होती. उपहारानंतर टीम इंडियाच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर जडेजा आणि सरफराज लागोपाठ बाद झाल्याने टीम इंडियाची अवस्था 5 बाद 120 झाली होती. (Photo Credit : PTI)
दुसऱ्या दिवशी बॅकफूटवर गेलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी अश्विन आणि कुलदीप यादवच्या फिरकीच्या जोरावर बाजी पलटली. (Photo Credit : PTI)
इंग्लंडचा दुसरा डाव दोघांनी अवघ्या 145 धावांमध्ये गुंडाळला. (Photo Credit : PTI)
तत्पूर्वी, ध्रुव जुरेलने केलेल्या 90 धावांच्या खेळीमुळे पहिल्या डावात टीम इंडियाला त्रिशतकी मजल मारता आली. त्याला कुलदीप यादवने संयमी साथ दिली. (Photo Credit : PTI)
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एकही विकेट न गमावता 40 धावा केल्या होत्या. (Photo Credit : PTI)