IND vs SA : विराट कोहली शतक करणार,भारत टी 20 वर्ल्ड कप जिंकणार, दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी
भारताचा आयसीसी स्पर्धेच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपावा अशी अपेक्षा चाहत्यांची आहे. भारतानं 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताला आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत आणि दक्षिण आफ्रिका टी20 वर्ल्ड कपच्या फायनलच्या निमित्तानं आमने सामने येणार आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.
विराट कोहलीसाठी यंदाचा टी 20 वर्ल्ड कप निराशाजनक ठरलेला आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी झाली नसली तरी विराटवर रोहित शर्मानं विश्वास ठेवला आहे.
इंग्लंडचा माजी स्पिनर माँटी पानेसरनं यांन मोठी भविष्यवाणी केली आहे. भारतीय संघ टी 20 वर्ल्ड कप जिंकणार असून विराट कोहली शतक करणार असल्याचं तो म्हणाला.
विराट कोहली यंदा रोहित शर्मासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये डावाची सुरुवात करत आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश वगळता इतर सामन्यांमध्ये विराटला चांगली धावसंख्या उभारता आली नव्हती.