Virat and Rohit : दिग्गज भारतीय क्रिकेटर विराट-रोहितची टी20 कारकिर्द संपली? सुनील गावस्कर म्हणतात...
भारतीय संघाचे दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची टी20 कारकिर्द संपली अशी चर्चा होताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही टी-20 मालिकेसाठी दोघेही टीम इंडियाचा भाग नसल्याचं दिसून आल्यामुळे या चर्चा होत आहेत.
या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यावर खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेतही स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतही दोघे नव्हते. आता न्यूझीलंडविरुद्धच्या देशांतर्गत टी-20 मालिकेतही टीम इंडियामध्ये विराट-रोहित बाहेर आहेत.
अशा परिस्थितीत विराट आणि रोहितची टी-20 आंतरराष्ट्रीय कारकीर्द इथेच संपली आहे का? तसंच विश्वचषक 2024 मध्ये ते संघात असतील का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
यानंतर माजी क्रिकटर सुनील गावसकर यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नेमकं काय उत्तर दिलं पाहू असे काहीसे उत्तर दिले.
सुनील गावसकर म्हणाले, 'मी ज्या पद्धतीने या निर्णयाकडे पाहत आहे, त्यावरून असं दिसतं की पुढील वर्षी टी-20 विश्वचषक होणार आहे आणि नवीन निवड समितीला यावेळी अधिकाधिक तरुणांना संधी द्यायची आहे. मात्र, याचा अर्थ रोहित किंवा कोहलीच्या नावाचा विचार केला जाणार नाही, असा अजिबात नाही.''
तसंच गावस्कर म्हणाले या दोघांनी 2023 मध्येही चांगली कामगिरी सुरू ठेवल्यास 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्यांचा समावेश नक्कीच केला जाऊ शकतो.
तसंच ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका खेळवली जाणार असल्याने निवडकर्त्यांनी त्यांना विश्रांती दिली असावी जेणेकरून ते या महत्त्वपूर्ण मालिकेत चांगली कामगिरी करु शकतील. असंही ते म्हणाले
या सर्व समोर येणाऱ्या बातम्यांतून नेमकं काही स्पष्ट होत नसल्याने रोहित आणि विराट पुन्हा टी20 संघात कधी येणार? हा प्रश्न कायम आहे.
तसंच टीम इंडियाकडे मजबूत बेंच स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळेच विराट आणि रोहितसारख्या मोठ्या खेळाडूंना विश्रांती दिल्यानंतरही टीम इंडिया विरोधी संघापेक्षा मजबूत दिसत आहे.