U19 Asia Cup 2021 Final : अंडर 19 आशिया कप भारताच्या खिशात, आठव्यांदा केली कामगिरी

दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर भारताच्या अंडर-19 संघाने आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकत चषकावर नाव कोरलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या विजयासह भारतानं आठव्यांदा आशिया चषक खिशात घातलं आहे.

भारताने श्रीलंका संघाला 9 विकेट्सने मात देत हा सामना जिंकला आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकूण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेच्या संघाला 38 षटकात 106 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, डेकवर्थ लुड्सच्या नियमानुसार भारताला 102 धावांचे लक्ष्य मिळालं. हे लक्ष्य भारतीय संघानं एक विकेट्स गमावून 22 व्या षटकातच पूर्ण केलं.
भारताचा सलामीवीर हरनूर सिंह स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशीनं नाबाद 56 धावांची खेळी केली. यात सात चौकारांचा समावेश आहे.
अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारतानं एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. भारताच्या विजयाचं संपूर्ण देशभरातून कौतुक केलं जातंय.
या विजयानंतर अनेक माजी खेळाडूंसह सर्व स्तरातून भारतीय संघाच कौतुक करण्यात येत आहे. (P.C. - BCCI Twitter)