वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo
Ind vs Ban:पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला.

India vs Bangladesh
1/8
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे.
2/8
भारतीय संघाने तब्बल 280 धावांनी बांगलादेशचा पराभव केला. या सामन्यात शुभमन गिल, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी चमकदार कामगिरी केली.
3/8
आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये रंगणार आहे.
4/8
भारताने बांगलादेशला 515 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 234 धावांत गडगडला.
5/8
बांगलादेशविरुद्धच्या या विजयानंतर सर्व खेळाडूंनी आनंद साजरा केला. रोहित शर्मा-विराट कोहली यांनी पहिले मिठी मारली.
6/8
अश्विन आणि जडेजाचं महत्वाचं योगदान राहिलं. त्यासोबतच पंत आणि गिलनेही मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे अश्विन, पंत आणि गिल सामना जिंकल्यानंतर एकमेकांना मिठी मारताना दिसले.
7/8
रविचंद्रन अश्विनने भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अश्विनने पहिल्या डावात शतक झळकावले आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स पटकावल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
8/8
सामना संपल्यानंतर घरचं मैदान असलेल्या अश्विनचं कुटुंब मैदानात उतरलं होतं. यावेळी अनेक भावूक क्षण पाहायला मिळाले.
Published at : 22 Sep 2024 12:49 PM (IST)