Jaykumar Gore: जयकुमार गोरेंकडून सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ, संजय राऊतांचा गंभीर आरोप, मंत्रालयासमोर महिला उपोषण करणार

धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत आला आहे. ग्रामविकास मंत्री आणि भाजपाचे नेते जयकुमार गोरे एका महिलेच्या मागे लागल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विकृत असल्याचं विधानही संजय राऊत यांनी केलं आहे.

जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वत:चे नग्न फोटो पाठवल्याचे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांने कसा विनयभंग आणि छळ केल्याचं कळतंय. ही महिला काही दिवासंनी विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे, असं संजय राऊतांनी सांगितले.
देवेंद्र फडणविसांनी पुन्हा एकदा पत्ते पिसले पाहिजे ही सगळी रत्न फडणविसांनी एकदा तपासली पाहिजे, असं राऊत म्हणाले.
जयकुमार गोरेंबद्दलचे आरोप महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग गेला अशा मंत्र्याला आपण मंत्रीमंडळात का ठेवलं आहे?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.
जयकुमार गोरेंसाठी आणखी कोणते पुरावे तुम्ही शोधताय यांच्या राजिनाम्याची मागणी कशाला करताय, त्यांना लाथ मारली पाहिजे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
महिलांच्या सबलीकरणाबद्दल देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने नैतिकतेवर बोलतायत..हे सगळे प्रश्न आम्ही केंद्राकडे पाठवणार, अमित शाह यांना पत्र लिहणार, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
सातारा जिह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या मंत्रीमंडळात ग्रामाविकास मंत्री आहेत. 2016 मधे काँग्रेसमधे असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अटकूपर्व जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलमधे रवानगीही झाली होती.
नेमकं प्रकरण काय?- जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने 2016 मध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आली. त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले. तिची बदनामी केली गेली. 9 जानेवारी 2025 रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले. त्यात 2016ची तक्रार होती. हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे, असे पीडित महिलेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.