तब्बल 7 वर्षानंतर शेतकऱ्यांना आले 'रेशमी' दिवस!
पारंपरिक शेतीबरोबरच अनेक जोडधंदे शेतकरी करतोय, त्यात महिन्याकाठी हमखास उत्पन्न देणारी रेशीम शेतीही आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2 वर्षांपूर्वी शेतकरी 'रेशीम' शेतीकडे वळले आणि कोरोनात लागलेल्या लॉकडाउनमुळे भाव उतरले. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं.
परंतु तब्बल 7 वर्षांनी रेशीम कोषचे भाव वाढल्याने शेतकरी मालामाल झाले आहेत.
सध्या रेशीम कोष 800 ते 900 रुपये प्रति किलो मिळत असल्याने रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशमी दिवस आले आहेत..
राज्यात मागच्या काही वर्षात रेशीम शेतीने वाढलीय. एकट्या परभणी जिल्ह्यात तब्बल 200 ते 250 हेक्टरवर शेती केली जाते
राज्यात परभणी रेशीम उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे.
कोरोना काळात शेतकऱ्यांनी जोपासलेल्या या रेशीम कोषचे भाव हे 150 रुपये प्रति किलोपर्यंत आले होते. मात्र सध्या याला सोन्याची किंमत मिळत आहे.