Health tips : पोळीला पर्याय म्हणून सतत पाव खातायं? जाणून घ्या शरीराला होणाऱ्या समस्या..

रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण जेवणासाठी शॉर्टकट शोधत असतो, पण हेच शॉर्टकट आरोग्यास धोकादायक ठरू शकतात. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजी पटकणं होते पण पोळ्या करायला वेळ लागतो म्हणून आपण पाव मागवतो, पण जास्त पाव खाणे आरोग्यास हानिकारक ठरते. (Photo Credit : unsplash)

पाव कधीही सकाळी आणि रात्री खाऊ नये त्यामुळे पोट लवकर बिघडते. पाव नेहमी दुपारी खावे. (Photo Credit : unsplash)
जगभरात प्रत्येक ठिकाणी पाव आणि पाव असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि लोक फार चवीने हे पदार्थ खातात. याची चव चांगली असली तरी पावाचे आरोग्यावर झालेले अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतात. (Photo Credit : pixabay)
पाव हा मैद्यापासून तयार करतात, त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक त्यात नसतात. फायबर, व्हिटॅमिन पावातून मिळत नाहीत. (Photo Credit : unsplash)
पाव पचायला जड असतो, त्यामुळे पोटाच्या समस्या उद्धवतात. पोटदुखी वाढते आणि अॅसिडीटीची समस्या निमार्ण होते. (Photo Credit : pixabay)
पावामध्ये मोठ्या प्रमाणात मैदा असतो , त्यामुळे पाव खाल्ल्याने शरीरातील कॅलरीज वाढतात परिणामी आपले वजनही वाढते. (Photo Credit : unsplash)
ब्लड प्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी पाव टाळावा. अति पाव खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. (Photo Credit : unsplash)
पाव दिर्घकाळ टिकण्यासाठी आणि मऊ राहण्यासाठी त्यात प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pixabay)