बलुचिस्तान (पाकिस्तान) : पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात हिंदू उद्योजक जयपाल दास आणि त्यांचा मुलगा हरेश दास यांची हत्या करण्यात आली. दरोडेखोरांनी लुटीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


पाकिस्तानस्थित मानवाधिकार कार्यकर्ते आणि प्रसिद्ध ब्लॉगर कपिल देव यांनी ट्वीटवरुन यासंदर्भात माहिती दिली.

कपिल देव म्हणाले, “हिंदू उद्योजक जयपाल दास आणि त्यांचा मुलगा हरेश यांचा गोळीबारात मृत्यू झाला. ते हब चौकी येथील त्यांच्या दुकानातून परतत होते. जानेवारीनंतर हे दुसरं दुहेरी हत्याकांड आहे. मात्र माध्यमं जलसा कव्हर करण्यात व्यस्त आहेत. कृपया, न्यायासाठी आवाज बुलंद करा.”


या दुहेरी हत्याकांडाविरोधात बलुचिस्तानातील कराची-क्वेटा मार्गावर निदर्शनं करण्यात आली. यावेळी रास्तारोको करण्यात आला.

दरम्यान, गुन्हेगारांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.