सोलापूर :  सोलापुरातील (Solapur)  हिंदू जन आक्रोश (Hindu Jan Aakrosh Morcha) मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी प्रकरणी पोलिसांनी (Solapur Police)  दोघांना अटक केली असून अन्य 12 ते 15 अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर  सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था ज्यांनी कोणी हातात घेण्याचा प्रयत्न केला असेल, त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी एमआयएम (AIMIM) शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी केली आहे. 


भाजप आमदार नितेश राणे आणि तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांच्या उपस्थितीत काल सोलापुरात वक्फ बोर्ड कायदा (Waqf Board Act)  रद्द करण्यात यावा या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कन्ना चौकपर्यंत हा मोर्चा निघाला होता. मात्र हा मोर्चा मधला मारुती परिसरात मोर्चा आल्यानंतर काही दुकानांची अज्ञात लोकांनी तोडफोड केली. तर काही जण दगडफेकीमुळे जखमी झाले. पोलिसांनी घटनास्थवरून सतीश शिंदे आणि शेखर स्वामी या दोघांना ताब्यात घेतलेलं होतं. रात्री उशिरा या दोघाना अटक करून अन्य 12 ते 15 अनोळखी आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भादंवि कलम 153(अ), 295, 295(अ), 143, 147, 149, 336, 337, 427, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


तोडफोडप्रकरणी एमआयएमची कडक कारवाईची मागणी


दरम्यान या मोर्चाच्या पूर्वी भाजप आमदार नितेश राणे, आमदार टी राजा सिंग  या दोघांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. तेढ निर्माण होईल अशी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, अशा आशयाची ही नोटीस होती. सभेदरम्यान नितेश राणे आणि  टी राजा सिंग यांनी कोणताही आक्षेपर्ह वक्तव्य केलं असेल तर त्यांची तपासणी करून रीतसर कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया पोलिसांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कडक अशी कारवाई करावी, या मागणीचे निवेदन देणार असल्याची प्रतिक्रिया एमआयएमचे शहराध्यक्ष फारुक शाबजी यांनी दिली आहे. 


वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून नितेश राणेंची टीका


वक्फ कायदा हा केवळ आपल्या देशात आहे, असा कायदा कोणत्याही इतर समाजासाठी नाही, इतकंच काय कुठल्याही इस्लामिक देशात ही कायदा नाही. आपल्या देशात जेवढी जमीन रेल्वे आणि सैन्याची नाही तेवढी जमीन वक्फ बोर्डाने घेऊन ठेवली आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकची जमीन कोणाकडे असेल तर ती वक्फची आहे. जिथे अशी जमीन वक्फची म्हणून मागायला येतील तिथे तुम्ही विरोध करून उभे राहिला तर राज्य आणि केंद्र सरकार तुमच्या मागे राहील.  


हे ही वाचा :