सांगली : आपण कुणाला फुल दिलं तर आपल्यालाही फुलच मिळतं, तर दगड दिला तर दगड मिळतात. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी शांत राहायचं. कोणाचे पाय कापून आपण उंच होणार नाही असं वक्तव्य अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी केलं. आटपाडीच्या गार्डी-घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते या लोकचळवळीचा औपचारिक शुभारंभ झाला.

Continues below advertisement

खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढविण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या कार्याचे कौतुक केलं. जॅकी श्रॉफ यांनी ट्री आर्मीच्या वृक्षलागवड चळवळीला भक्कम पाठिंबा दिला. 

कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले की, फक्त बोलणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे यांच्यात फरक असतो. सुहास बाबर हे बोलण्याइतकेच कृतीतही प्रामाणिक आहेत. जॅकी श्रॉफ यांनी वृक्षलागवडीच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. पृथ्वी ही आपली आई असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, असा संदेशही त्यांनी दिला.

Continues below advertisement

आमदार सुहास बाबर यांनी ट्री आर्मी ही कोणत्याही पक्षाची नव्हे तर समाजाची चळवळ असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प केला असून पुढील दोन वर्षांत ७८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जॅकी श्रॉफ यांच्या सहभागामुळे या मोहिमेला राष्ट्रीय ओळख मिळणार असून विट्यातून सुरू झालेली ट्री आर्मी आता देशभर आणि जगभर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार बाबर म्हणाले, मला मी खूप जमिनीवर राहून काम करतो असे वाटायचे. परंतु जॅकी दादांच्याकडे पाहिल्यावर माझा हा भ्रम फुटला आहे. एक सेलिब्रिटी असून देखील किती विनम्र आणि किती साधे असावे हे पाहून आवाक झालो आहे.

जॅकी श्रॉफ यांचे खानापुरात औक्षण करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर बाजरीची भाकरी, तूप, गूळ आणि मीठ असा साधा नाष्टा त्यांनी केला. एवढा साधा माणूस मी माझ्या आयुष्यात पाहिला नसल्याचे गौरवोद्गार आमदार बाबर यांनी काढले. 

ही बातमी वाचा: