रत्नागिरी: सध्या पावसाळा असल्याने आणि पहिल्याच टप्प्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने नदी, तलाव आणि जलाशय भरुन वाहू लागले आहेत. दुसरीकडे हिरवागार निसर्ग फुलून गेला असून धबधबेही वाहत आहेत. त्यामुळे, पर्यटकनासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. निसर्गरम्य ठिकाणी आणि धार्मिक पर्यटनासाठी येत पावसाळा पर्यटनाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, धुळे (Dhule) जिल्ह्यातील एक जोडपे कोकणात पर्यटनासाठी आल्यानंतर त्यांनी येथील चिपळूण (Ratnagiri) विशिष्ठी नदीत उडी घेत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (police) प्रशासन आणि आपत्ती बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. 

Continues below advertisement


रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये दोघांनी वाशिष्ठी नदीत उद्या टाकून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी बुडतानाचा व्हिडिओ वायरल झाला असून नदीत उडी टाकणारे दोघेही धुळे येथील असल्याची माहिती आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. चिपळूणमधील गांधेश्वर मंदिराच्या येथील ही घटना असून तरुणी पाण्यात बुडताना व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पाण्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी, चिपळून पोलीस अधिक तपास करत आहे. 


हेही वाचा


माणिकराव कोकाटे 18 ते 22 मिनिटं ते पत्ते खेळत होते; अंजली दमानियांचा दावा, आमदाराचा दिला दाखला