पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra Modi) यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) कोणतीही ऑफर दिली नाही तर त्यांना सल्ला दिला, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanavis) यांनी दिलं आहे. पुण्यात पत्रकार संघाच्यावतीने देवेंद्र फडणवीसांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. बारामतीची जागा अजित पवारांकडे  जात आहे.  त्यानंतर पवारांनी सांगितलं 4 जून नंतर क्षेत्रिय पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर मोदींनी त्यांना महायुतीसोबत येण्याची ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर नसून मोदींनी शरद पवारांना दिलेला सल्ला आहे, असं फडणवीस म्हणाले. 


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही तर चांगला सल्ला दिला होता. मोदी म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जाऊनही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसोबत यावं. त्यामुळे राजकीय मनसुभे सुटतील.


पुढे बोलताना त्यांनी शरद पवारांच्या राजकारणाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की, शरद पवारांची राजकीय कारकिर्द आपल्याला माहिती आहे. त्यांचा पक्ष जेव्हा कमजोर झाला तेव्हा ते कॉंग्रेसमध्ये विलिन झाले आणि आपली जागा नीट करु घेतली. हे सगळं 1977 पासूनचं राजकारण आहे. काँग्रेसमध्ये विलीन होतात आणि पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडतात. शरद पवारांचं राजकारण ज्यांना माहिती आहे. त्यांना हे सगळं शरद पवारांचं वागणं समजू शकतं, असा टोलाही लगावला. 


उद्धव ठाकरे फडणवीसांवर प्रत्येकवेळी टीका करताना दिसतात. त्यावर आता फडणवीसांनी त्यांना सणसणाीत भाषेत उत्तर दिलं आहे. काही लोक सिरीयस बोलले तर ते मनावर घ्यायचं असतं. मात्र काही लोक नुसते बडबड करत सुटले आहेत. त्यामुळे ते सिरीयस झाले आहेत. त्यांना मदतीची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंना कोणत्यातरी मानसोपचार तज्ञांकडे घेऊन जा, असं मी त्यांच्या पक्षातील लोकांना सांगतो आणि डॉक्टरांकडे नेऊन त्यांच्या मनावरचं ओझं दूर करा, असाही सल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिला आहे. 


इतर महत्वाची बातमी-