Suhas Babar and Rohit Patil : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर (Suhas Babar) आणि तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील (Rohit Patil) या दोन तरुण आमदारांमध्ये एका व्यासपीठावर राजकीय जुगलबंदी रंगली. 

Continues below advertisement


खानापूर घाटमाथ्यावरील बेणापूर येथील विवेक कृष्णराव शिंदे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परिक्षेत 93 वा नंबर पटकावून भारतीय पोलीस सेवा (IPS) पद मिळवले. याबद्दल बेणापूर येथे त्याचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी आमदार रोहित पाटील आणि सुहास बाबर यांच्या राजकीय फटकेबाजी रंगली.


सुहास बाबर रोहित पाटलांना म्हणाले, 'व्हेरी गुड मॅन, बट इन बॅड कंपनी'


सुरुवातीला आमदार सुहास बाबर यांचे भाषण झाले ते म्हणाले की, रोहितदादांचं कसं आहे? आता आयपीएल सुरू आहे.  मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा आहे. तो चांगला खेळतोय. पण, टीम काही जिंकत नाही. तसंच रोहितदादांच्या राजकारणाचं झालंय. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. पण, त्यांच्या पक्षाला काय परफॉर्मन्स करता येईना. आमचं त्यांच्याबद्दल मत आहे की "व्हेरी गुड मॅन बट इन बॅड कंपनी". पण त्यांची एक गोष्ट चांगली आहे, ते पवारांच्या पक्षात आहेत. पण अजित पवार, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे या सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले आहेत. मला असं वाटतंय की, जर तुम्ही यूपीएससी परीक्षा दिली असती तर ह्या सगळ्या गुणांचा तुम्हाला फायदा झाला असता आणि तुम्ही फार मोठे अधिकारी झाला असता. कारण विरोधात असून सुद्धा ही राजकीय मंडळी हाताळायची कशी? ही लकब आर. आर. आबांपेक्षा तुम्हाला जास्त चांगली जमतेय, असे म्हणत सुहास बाबर यांनी रोहित पाटील यांचे कौतुक केले.


आर. आर. आबांच्या लेकाचंही जशास तसं उत्तर


तर रोहित पाटील म्हणाले की, आता आमचा निम्मा संघ स्टेडियमच्या बाहेर बसलाय. निम्मा संघ आत खेळतोय. आतल्या निम्म्या संघाचे सब्स्टिट्यूट प्लेयर खेळत आहेत, त्यात आम्ही मिसळलो तर आमचा संघ किती मजबूत येईल याचा विचार करा, अशी गुगली तासगाव मतदार संघाचे आमदार रोहित पाटील यांनी गुगली टाकली. सध्याची परिस्थिती काही जरी असली तरी पाच वर्षानंतर फायनल आम्हीच मारणार, असा ठाम विश्वासही रोहित पाटील यांनी या व्यासपीठावरुन बोलून दाखवला. सुहास बाबर आणि रोहित पाटील यांच्या राजकीय जुगलबंदीची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.   



आणखी वाचा 


Pahalgam Terror Attack: मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार का गेले नाहीत? खरं कारण आलं समोर