Sharad Pawar, मुंबई : "पुतळा कोसळला आणि सांगितलं जात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली. त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते. त्यांनी कधी माफी मागितली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. विषय काय? लोकांची अस्वस्था काय? आता विषय काय आहे आणि हे बोलतं आहेत. आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते?  ज्यांनी रयतेच राज्य आणल त्यांची तुलना कशा प्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं. याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी आणि चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता. अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करता", असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.


मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक 


शरद पवार म्हणाले, मुस्लीम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे. दारिद्र रेषेखाली असणाऱ्या मुस्लीमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिक्षणाच्या संदर्भात मर्यादीत संधी ज्यांना मिळते, त्यामध्ये मुस्लीम समाजाचे घटक अधिक असतात. मुस्लीमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टीकोण समाजातील काही घटकांमध्ये आहे. 


भाक्रा नांगल धरण बांधण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता


पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. लोकांचं जीवन बदलण्यासाठी अखंड ते प्रयत्न करत होते. ज्यावेळी ते मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी कराडमध्ये गेले. ते आईला भेटायला गेले. त्यावेळी त्यांच्या आईला कळलं नाही की आपला मुलगा मुख्यमंत्री झाला. त्यांनी पहिला प्रश्न विचारला की आपला मुलगा मामलेदार झाला की तहसीलदार झाला?  त्यांना माहिती नव्हतं मुलगा मुख्यमंत्री झाला ते. विधानसभेत विरोधी पक्षनेते एसएम जोशी होते. त्यावेळी त्यांनी सभागृहात काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी त्यांना एक तरूण मंत्री उत्तर देत होता. त्याने 3 वेळा उत्तर दिलं परंतु तरिदेखील जोशी यांनी काही उपप्रश्न विचारले त्यावेळी सदर मंत्री म्हणाला त्यांच्या डोक्यात घुसत नाही त्याला मी काय करू? त्यावेळी पटकन यशवंतराव चव्हाण उभे राहिले आणि त्यांनी सभागृहाची माफी मागितली. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांचे राज्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूर दृष्टी महत्वाची होती. भाक्रा नांगल धरण बांधण्याचा निर्णय बाबासाहेबांनी घेतला होता. शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांनी सतत आधुनिकतेची कास धरली होती.


इतर महत्वाच्या बातम्या 


Congress leader : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने पत्नी अन् 2 मुलांसमवेत विष खाल्लं, उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू