Sadabhau Khot on Sharad Pawar : माजी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार म्हणजे अलीबाबा, त्यांच्या एवढा पापी या जगात कोणी नाही अशी टीका सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर केली. शरद पवारांना मानावं लागेल, आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवलं, नाहीतर त्यांनी आकाशात सुद्धा राज्य केलं असतं असा टोलाही खोतांनी पवारांना लगावला.  


यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस 


यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस असल्याचे सदाभाऊ खोत म्हणाले. महाराष्ट्रात जो गोंधळ सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरु असल्याचे खोत म्हणाले. शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्याची टीकाही सदाभाऊ खोतांनी केली आहे. तसेच पवारांनी या महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संपवला, पण या महाराष्ट्रातून शरद पवार यांना एकच माणूस संपवता येत नाही, त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांना संपवता येत नाही म्हणून शरद पवार महाराष्ट्रात आग लावत सुटल्याचे खोत म्हणाले.


यावर्षीची निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध 


येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही खोतांनी केली. यावर्षीची निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध असल्याचे खोत म्हणाले. एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पांडवांची फौज या निवडणुकीत उभी राहणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कौरवांची फौज उभी राहणार असल्याचे खोत म्हणाले. त्यामुळं महाविकास आघाडीच्या या लुटारुंना गाढावं लागेल अशी टीका खोतांनी केली.  


सत्तेच्या लालसेसाठी तुम्ही तत्त्वांना तिलांजली दिली, उद्धव ठाकरेंवर खोतांची टीका


भारतीय जनता पार्टीमधील नेत्याने विश्वासघात केला असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. विश्वासघाताचं विष रोपण तुम्हीच केल्याचे खोत म्हणाले. 2019 ला महायुती करून या राज्यात कोणी निवडणुका लढवल्या? सत्तेच्या लालसेसाठी तुम्ही तत्त्वांना तिलांजली दिल्याचे खोत म्हणाले. दरम्यान, वसंतदादांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्या पवारांना सोबत घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे म्हणत सदाभाऊ खोत यांनी उद्दव ठाकरेंवर टीका केली. हे महाराष्ट्राची जनता जाणत आहे. त्यामुळं म्हाविकास आघाडी ही टोळी आहे. त्यामुळं या टोळीचा बंदोबस्त येणाऱ्या निवडणुकीत जनता करेल असेही खोत म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Sadabhau Khot : मुस्लिमांच्या सासऱ्यांनंतर आता शरद पवारांचा अलिबाबा म्हणून उल्लेख; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका