Praniti Shinde on Ram Satpute, Pandharpur : "दोन-दोन खासदार निवडले. पण कामाच्या कोऱ्य पाट्या आहेत. अनुभव नाही, काम नाही. तरिही तुम्ही मोठ्या मनाने त्यांना निवडून आणलय. दोघांनीही खासदारकी वाया घालवली. लोकसभेत एकदा पण बोलले नाहीत. त्यांच्याच पक्षाने त्यांना निष्क्रिय असल्याची पावती दिली. सत्ता असून सुद्धा, पंतप्रधान असून सुद्धा 3-3 वेळेस पंतप्रधान बदलावे लागतात. ही शोकांतिका आहे. पहिला उमेदवार आणला तो बदलला. दुसरा बदलला आता उपरा आणला", असं  म्हणत सोलापूर लोकसभेच्या मविआच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर निशाणा साधलाय. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार  धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) , शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथराजे देशमुख, सक्षणा सलगर आदी नेते उपस्थित होते. 



गुजरातचा कांदा बाहेर जातोय पण महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय


प्रणिती शिंदे म्हणाल्या, मायबाप शेतकऱ्यांनी मला हिंमत दिली आहे. मला अनेक गावातील शेतकरी मायबाप म्हणाले की, आम्ही ठरवलंय आमचं ठरलंय भाजपविरोधातच मतदान करायच आहे. गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांना त्रास झालाय. गावागावात पाणी नाहीये. उजनीचं नियोजन नाहीये. कांदा निर्यात बंद केलीये. गुजरातचा कांदा बाहेर जातोय पण महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय. जीएसटीच राक्षस उरावर येऊन बसलंय. 15 लाखांच्या अमिषामुळे 10 वर्षे मागे गेलो आहेत. हे पाप भारतीय जनता पक्षाचे आहे. तुमच्या मताची भाजपला किंमत राहिलेले नाही. आणखी किती अपमान सहन करणार आहात ? आता येऊन म्हणतात उमेदवाराकडे बघूच नका. पंतप्रधानांकडे बघा म्हणतात. दोघांना काय दिवे लावलेत? असे सवालही प्रणिती शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले. 


पर्वा खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं


पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधानांचे पर्वाचे भाषण ऐकले असेल कामाबद्दल बोलत नाहीयेत. मुद्यावर बोलत नाहीत. मुद्यावर येत नाहीत. मागील दहा वर्षात सोलापूरला काय केले? हे सांगत नाहीयेत. फक्त जाती पातीची आणि धर्मची कीड भारतीय जनता पक्षाने देशाला लावली आहे. आपल्या लोकशाहीला दृष्ट लावली आहे. पंतप्रधान देशाला संभाळणार असला पाहिजे. तो पक्षाचा नसतो देशाचा असतो. पर्वा खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं. रामाचे मंदिर बांधले यांचे स्वागत करतो. कधीतरी विठू माऊलीबरोबर सेल्फी करा. फक्त समाजात तेढ निर्माण करतात. एकी बिघडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पोलिसांना मी सलाम करते. राज्यकर्ते तेढ निर्माण करतात, पण पोलीस ते सांभाळतात. ही लढाई एकट्याची नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. संविधान बदलण्याची भाषा करतात, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Abhijeet Patil : सोलापूर आणि माढ्यात आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती, धैर्यशील मोहितेंचा रणजित निंबाळकरांवर हल्लाबोल